Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

*भारत सरकारने कांदा निर्यात बंदीची जाचक अधिसूचना त्वरित मागे घ्या- श्रेयश नाईक* *मा.पंतप्रधानमंत्री भारत यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी.*




*भारत सरकारने  कांदा निर्यात बंदीची जाचक अधिसूचना त्वरित  मागे घ्या- श्रेयश नाईक*
******************************

*मा.पंतप्रधानमंत्री भारत यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी.*



 सांगली  ( प्रतिनिधी)   भारत सरकारने कांदा निर्यांतीवर घातलेली बंदी त्वरीत मागे घेण्याबाबतची मागणी पंतप्रधानांकडे सांगली जिल्हाधिकार्यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी ईमेलव्दारे केली आहे. सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की  दिनांक 14  सप्टेंबर 2020 रोजी वाणिज्य मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत  काढण्यात आलेल्या  आधीसुचनेमध्ये  तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी. ही जाचक  सूचना देण्यात आली. या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2020 संबंध भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था ,  कोरना महामारी, नेहमीच दुष्काळ अतिवृष्टी नापिकी, बोगस बियाणे, कर्जबाजारीपणा, जी.एस.टी, नोटा बंदी, इत्यादी संकटाने शेतकरी त्रासलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भारतामध्ये शेतकरी कष्ट करून उत्पन्न  घेतात, आज कसातरी कांद्याला चांगला भाव मिळत आहे परंतु योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत असतांना शासनाच्या ह्या  अन्यायकारक निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
 'शेतकऱ्यांच मरण हेच सरकारच धोरण' हे कांद्याची निर्यात बंदी करून सरकारने सिद्ध केल आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. त्याचा संभाजी ब्रिगेड जाहीर तिव्र निषेध करीत आहे.
 तरी माननीय प्रधानमंत्री  यांना विनंती आहे की, कांदा निर्यात तात्काळ चालू करा अन्यथा  संभाजी ब्रिगेड भारत सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल  तसेच भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील.अशा आशयाचे निवेदन मा.पंतप्रधानांना सांगली जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा