Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

*56 लाखांचा गंडा घालणाऱ्या करमाळ्यातील सागर कांबळेची अखेर* *समाज अशा घटनांमधून बोध घेणार का?**AJ 24 Taas News Maharashtra*



*56  लाखांचा गंडा घालणाऱ्या करमाळ्यातील सागर कांबळेची अखेर*

 *समाज अशा  घटनांमधून बोध घेणार का?*
*AJ 24 Taas News Maharashtra
*करमाळा प्रतिनिधी/अतुल वारे पाटील

 करमाळा प्रतिनिधी दिं.11.
अनेक वस्तू निम्म्या किमतीत देण्याच्या आमिषाला बळी पडून करमाळा तालुका  व परिसराला 56 लाखांचा गंडा घालणाऱ्या सागर कांबळे या युवकाचा मृतदेह पुण्यामध्ये सापडल्याने तालुक्यात खळबळ माजली असून आपले पैसे माघारी मिळतील ही तालुका व परिसरातील नागरिकांच्या असलेल्या सर्व आशा आता संपुष्टात आल्या आहेत.
    अवाजवी मोबदल्याच्या अपेक्षेने अशा विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या नागरिकांनी यातून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे .
     याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी करमाळा येथे *नवचैतन्य सोशल फाउंडेशन*या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना निम्म्या दरात विविध प्रकारच्या वस्तू जसे की शिलाई मशीन, मोटार सायकल, ट्रॅक्टर , पिठाची गिरणी अशा वस्तू तो देत होता. एकावेळी दोनशे ते तीनशे लोकांना करमाळा तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमात तो या वस्तूंचे वितरण करत होता. यामुळे लोकांचा त्याच्यावर अधिक विश्वास बसला आणि या योजनांमध्ये लोकांनी विचार न करता गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तालुक्यातील अनेक लोकांना याचा फायदा झालाही. सुरुवातीच्या टप्प्यात शिलाई मशीन , पिठाची गिरणी देणारा सागर कांबळे यानंतर मोटार सायकल, ट्रॅक्टर ,जेसीबी अशा जास्त किमतीच्या वस्तू निम्म्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून प्रचंड पैसा गोळा केला. आणि हा सर्व पैसा घेऊन त्याने पोबारा केला. यादरम्यान फेसबुक ,व्हाट्सअप यासारख्या सोशल माध्यमातून लोकांना त्यांचे पैसे माघारी देण्याच्या पोस्ट त्याने व्हायरल केल्या. त्यामुळे आपले गुंतलेले पैसे माघारी मिळतील अशा तालुकावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पुण्यामध्ये एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आशा आता मावळलेल्या आहेत. निम्म्या किमतीमध्ये वस्तू कशा मिळू शकतील एवढा विचार सुद्धा नागरिकांनी केला नाही. त्यामुळे अशा घटनांमधून बोध घेऊन नागरिकांनी विचारमंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
     आज आपल्या देशात  अशा अनेक फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून अनेक मार्केटिंग कंपन्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असतात. जास्त व्याजदराचे आमिष दाखवणे ,कमी कालावधीमध्ये दामदुप्पट रक्कम देण्याचे प्रलोभन दाखवणे अशा प्रकारचे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून समाजामध्ये चालू आहेत. अशा प्रलोभनांना भुलतात त्या बापड्या स्रिया. कधी लॉटरी च्या  माध्यमातून घरगुती वस्तू  लागल्याचे  आमिष दाखवून सुमार दर्जाच्या वस्तू दुप्पट किमतीला विकण्याचा गोरखधंदा ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो .घरातील कर्ता पुरुष कामासाठी गेलेला असताना स्त्रियांना या जाळ्यांमध्ये ओढले जाते आणि कुकर ,मिक्सर, गॅस शेगडी अशा वस्तू दुप्पट किमतीत ग्राहकांच्या माथी मारल्या जातात . आपली फसवणूक झाली आहे असे ग्राहकांच्या लक्षात येते परंतु त्या वेळेस खूप उशीर झालेला असतो .चांडाळ चौकडी तालुका- जिल्हा सोडून पसार झालेली असते .आणि नागरिकांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. सागर कांबळेचेही असेच झाले.  सहा हजार रुपये किंमत असलेली शिलाई मशीन अडीच-तीन हजार कशी मिळेल ? पन्नास हजार किंमत असलेली मोटर सायकल 25 हजारात कशी मिळेल? याचा विचार करण्याचे भान नागरिकांना राहिले नाही आणि प्रचंड संख्येने लोकांनी योजनेमध्ये आपला पैसा गुंतवला. तसेच या वस्तूंचे वितरण करण्याचा समारंभ सागर कांबळे ने मोठमोठ्या राजकीय लोकांना आमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत या वस्तूंचे वितरण केल्यामुळे लोकांना असे वाटले होते की सागर कांबळे च्या माध्यमातून हे राजकीय लोक पंचायत समिती तसेच विविध शासकीय योजना मधील या वस्तू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा प्रकारचा ठाम विश्‍वास लोकांमध्ये निर्माण झाला होता. सागर कांबळे च्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित राहून थाटा माटात मिळणारी राजकीय मंडळी सागर कांबळे ने पोबारा करतात सर्वांनी हात झटकले. आपला व त्याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी जाहीर केले आणि लाखो रुपयांचा हा घोटाळा समाजासमोर आला. 
   विविध कंपन्यानी आजतागायत आपल्या देशातील लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे . *पिअरलेस, ट्विंकल ग्रुप ,पल्स कंपनी, समृद्ध जीवन* ही काही ठळक उदाहरणे. 
   आतातरी नागरिक सारासार विचार करून अशा फसव्या जाहिरातींना बळी न पडता, जास्त व्याजदराच्या आमिषांना , विविध प्रलोभनांना बळी न पडता, सारासार विवेकाने विचार करून ,आपला पैसा गुंतवताना हजार वेळा विचार करतील हा धडा या निमित्ताने घेतील हीच अपेक्षा. 
*सोशल माध्यमांवर हात जोडून जीवन संपवले*
 
*कारमाळ्यातून पोबारा केल्यानंतर सागर कांबळे याने बऱ्याच वेळा सोशल माध्यमातून लोकांना पैसे माघारी देण्याचे जाहीर केले होते. परवाही त्याने अशाच प्रकारचा संदेश सोशल माध्यमांवर टाकला. पण या वेळेचा संदेश थोडा वेगळ्या प्रकारचा होता. हात जोडलेली स्मायली त्याने प्रसिद्ध केली. एक प्रकारे त्याला तालुका व परिसरातील त्याने फसवलेल्या लोकांची त्याला माफी मागायची असेल , असेच म्हणावे लागेल.उरळीकांचन जवळील शिंदवणे घाटात त्याचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा