*उत्तरप्रदेश मधील बलात्कार व हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भीमनगर व समविचारी पक्ष व संघटना यांच्याकडून बार्शी तहसील कार्यालय यांना लेखी निवेदन देण्यात आले*
बार्शी प्रतिनिधी
उत्तरप्रदेश मधील हाथरास येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून अरिपींना कडक शासन व्हावे, उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी , पीडित मनीषा वाल्मिकीची सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी, पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी,ऍट्रोसिटी कायदा आणखी कडक करण्यात यावा, महिला अयोगामध्ये दलित महिलेची नेमणूक करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी बार्शी तहसील कार्यालय यांना लेखी निवेदन देण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा