*पोलिसांच्या आईने घेतला सरपंच प्रतिनिधीचां चावा एक दिवस पोलीस कोठडी*
*Aj 24Taas News Maharashtra*
*टेंभुर्णी प्रतिनिधी*
*वडोली येथे शेताच्या कारणावरून झाले होते भांडण*
*काळे पती-पत्नीस पोलीस कोठडी तर बंडगर यांची जामिनावर सुटका*
टेंभुर्णी (प्रतिनिधी) : - माढा तालुक्यातील वडोली येथे शेताच्या कडेने सरकारी चारी का काढली व दगडी ताल का बुजविली यावरून झालेल्या भांडणात बंडगर व काळे यांच्यात हाणामारी होऊन दोनजण जखमी झाले असून सरपंच प्रतिनिधी बंडगर यांच्या दंडाला महिलेने चावा घेऊन तर त्यांच्या पतीने लोखंडी सळईने मारून हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी पतीपत्नीस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
या भांडणात दोन्हीकडील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे वडोली येथे गावात जात असताना सुभाष काळे व त्यांची पत्नी उर्मिला काळे या दोघांनी शेताच्या कडेने सरकारी चारी का काढली असा जाब विचारून सरपंच प्रतिनिधी आप्पा बंडगर यास काळे पती-पत्नीने लोखंडी सळईने खांद्यावर मारून हाड फ्रॅक्चर करीत चावा घेतल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेतील सुभाष काळे व उर्मिला सुभाष काळे हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची आई व वडील आहेत.
याबाबत आप्पा किसन बंडगर (वय-२९)याने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.०२ ऑक्टोबर रोजी सकाळी मोटर-सायकलवर गावात जात असताना सुभाष काळे व उर्मिला सुभाष काळे यांनी रस्त्यात आडवून तू आमच्या शेताच्या कडेने सरकारी चारी काढली असा जाब विचारला.त्यांना शासकीय गायरानातून चारी घेतली आहे असे सांगत असताना,तुला लय माज आलाय का असे म्हणून सुभाष काळे याने हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली.यावेळी खाली पडल्यावर त्यांची पत्नी उर्मिला काळे यांनी गच्चीला धरून उजव्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतला दोघांनी मिळून शिवीगाळ करून परत जर आमच्या शेताकडे आला तर जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी केली.तसेच वरील दोघांनी नंतर घरी जाऊन माझी पत्नी सरपंच अर्चना बंडगर हिस तुझा नवरा आज वाचला आहे.त्यास सापडल्यावर जिवंत सोडणार नाही असे म्हणून दमदाटी केली अशी फिर्याद दाखल केली आहे.
तर उर्मिला काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,अर्चना आप्पा बंडगर व आप्पा बंडगर यांनी येऊन वड्याच्या बाजूला तुम्ही दगडाची ताल का बुजविली असे विचारले असता मी त्यांना तुम्ही ताल का बुजविली असे विचारताच दोघांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून साडी,ब्लाउजला धरून खाली ढकलून दिले. यावेळी गावतील विजय नानासो बंडगर,धनाजी नानासो बंडगर यांनी म्हटले की,यांनी दगडी ताल बुजविली आहे,यांच्याकडे बघा म्हणत पती सुभाष काळे यांच्या हाताला व विजय धनाजी बंडगर,आप्पा बंडगर यांनी धक्का बुक्की करून गळा धरला.तेव्हा पतीला जीवे मारता का असे ओरडली व तेथे गेली असता बापू बंडगर याने साडी हिसकावून फेकून दिली.तसेच रुपाली बंडगर,शारदा बंडगर,किसन बंडगर या तिघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.छेडछाड, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन्ही कडील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.टेंभुर्णी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून आज मंगळवारी माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काळे पती-पत्नीस एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर बंडगर पती-पत्नीसह इतर सहाजनांची जामिनावर सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ स्वामीनाथ लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा