Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

वादळी पावसामुळे बाधित भागात केंद्राने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी:-नितीन झिंजाडे***

*वादळी पावसामुळे बाधित भागात केंद्राने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी:-नितीन झिंजाडे**
*अतुल वारे पाटील- करमाळा* 


     परतीच्या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागामध्ये केंद्राने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
       याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे.हजारो हेक्टर शेतीवरील तूर,उडीद,मका,सोयाबीन यासह नगदी पिके ऊस,केळी,कपाशी,भाजीपाला व फळबागा  पिकांचे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी साचून घरांची पडझड झाली आहे.आंध्रप्रदेश,महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीसह इतर क्षेत्राचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे त्यात या वादळी स्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करून आपत्तीग्रस्त भागातील लोकांना सरसकट मदत जाहीर करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाच्या  प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे,माढा लोकसभा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठवण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा