Breaking

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊसतोड मजूरांची दिवाळी केली गोड ..बेंबळे



विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊसतोड मजूरांची दिवाळी केली गोड ..

बेंबळे प्रतिनिधी /सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी:- आपले गाव, घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड मजूरांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे चेअरमन आ. बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड मजूरांना दिवाळी निमित्त ऊसाच्या फडात जावून फराळाचे वाटप करून ऊसतोड मजूरांची दिवाळी गोड करण्यात आली.

यावेळी साखर कारखान्याचे अधिकारी नितीन पाटील, सचिन ढवळे, मिटकलवाडी गावचे मा. सरपंच मोहन लोकरे, लक्ष्मण ठेंगल, शिवाजी मिटकल, सचिन मिटकल, भाऊ मिटकल यांच्यासह ऊसतोड मजूर उपस्थित होते. महाराष्ट्रात सर्वत्र दिवाळीचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र,ऊसतोड मजूर आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेकडो कीलोमीटर दूर येतात. पहाटेपासून कडाक्याच्या ठंडीतही फडात जावून ऊस तोडणी करतात. हिंदू धर्मात सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या आनंदापासून ऊसतोड कामगार वंचित राहू नये , त्यांच्या मुलांबाळांना गोडधोड खाण्यास मिळावे या हेतूने विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊसतोड मजूरांना फराळ वाटून त्यांची दिवाळी गोड केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा