* पदवीधर मतदार संघामध्ये साखर कारखानदारांचे काय काम - काेकाटे *
कुर्डुवाडी : प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharashtra channel
जे लोक पदवीधर आहेत त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्या साठी शासनाने पदवीधर मतदारसंघ निर्माण केलेला आहे . परंतु मोठ्या राजकीय पक्षाने दोन साखर सम्राटांना उमेदवारी दिल्याने पदवीधरांचे प्रश्न त्यांना कधीही समजू शकणार नाहीत यामुळे पदवीधर मतदार संघामध्ये या साखर कारखानदारांचे काय काम ? असा सवाल या मतदार संघा मधील अपक्ष उमेदवार लेखक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी कुर्डुवाडी येथे झालेल्या मेळाव्यात केला .
@ पुणे पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा प्रचारार्थ माढा तालुक्यात झंझावती दौरा झाला यानिमित्त कुर्डुवाडी येथे त्यांचा पदवीधरांचा मेळावा झाला यानिमित्त ते बोलताना म्हनालेकी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील ८९ तालुक्यात हा मतदारसंघ पसरलेला आहे . गेली दोन वर्ष झाले मतदार नोंदणी व प्रचारासाठी दोन वेळा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे . गेली वीस वर्षे झाली या पाच जिल्ह्यांमध्ये अनेक गावात माझी व्याख्याने झालेली आहेत . यामुळे बहुजन समाजासी माझी नाळ जाेडलेली आहे . सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील दोन साखर सम्राटांना भाजपने व राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे . सामाजिक प्रबोधनाच्या जोरावर पलूस तालुक्यातही मला या दाेघा पेक्षा जास्त मते पडनार असल्याचा ठाम आत्मविश्वास कोकाटे यांनी बोलून दाखवला .
@ कोकाटे म्हणाले मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार जे लोक पदवीधर झालेले आहेत त्यांच्या विकासासाठी आर्थिक उन्नती महामंडळ स्थापन करनार आहे . छत्रपती शिवाजी महाराजा प्रमाणे त्यांना शून्य टक्के व्याजदराने उद्योग विकासा साठी कर्ज मिळवून देनार आहे . जे पदवीधर सुशिक्षित बेकार आहेत त्यांना दहा हजार रुपये महिना बेरोजगार भत्ता मिळवून देणार आहे . शासकीय कर्मचाऱ्यांना २००५ साला पासून जी पेन्शन योजना बंद झालेले आहे ती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करनार आहे . विनाअनुदानित शाळा कॉलेज मध्ये जे शिक्षक प्राध्यापक काम करत आहे त्यांना तत्काळ अनुदान मंजूर करण्या साठी जीवापाड प्रयत्न करनार आहे . महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न करनार आहे . अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा व्हावा . शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी प्रयत्न करनार आहे . सामाजिक समता जातीय सलोखा सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी दिले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद रजपूत होते . यावेळी योगेश जाधव सहा मान्यवरांची भाषणे झाली . कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी परिश्रम बाळासाहेब बागल विजय पाटील अनील भाेसले यांनी घेतले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा