टेंभुर्णी ! प्रतिनिधी
अनुसूचित जाती मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यामध्ये दोन नंबरवर असणाऱ्या मातंग समाजजास राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर मातंग समाजाला जाणूनबुजून प्रतिनिधित्व न दिल्यामुळे समाज महाविकास आघाडीवर प्रामुख्याने काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात नाराज झाला असून याची किंमत येणाऱ्या पदवीधर निवडणूक , महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत याची किंमत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मोजावी लागेल, असे प्रतिपादन मातंग समाजाचे नेते रामभाऊ वाघमारे यांनी केले आहे.
टेंभुर्णी तालुका माढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अखिल महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचे वतीने गेल्या सहा महिन्यांपासून मातंग समाजातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, याच मागणी पैकी एक मागणी म्हणजे विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून गेल्या साठ वर्षांत मातंग समाजाला एकाही राजकीय पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली नाही. मातंग समाजामध्ये सुध्दा कला, साहित्य, सहकार क्षेत्रातील तसेच शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, समाजसेवक मोठ्या प्रमाणात असून हा समाज पहिल्या पासून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला असून गेल्या सहा महिन्यांपासून मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, ना. धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत या सर्व प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मातंग समाजातील कुठल्याही एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी देण्याची मागणी केली होती. असे असताना सुद्धा मातंग समाजाला जाणूनबूजून डावलून मातंग समाजाची अवहेलना केली आहे. असि सूर संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजबांधवातून निघत आहे. पर्यायाने मातंग समाज प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडी वर प्रामुख्याने काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे.समाजातील सुशिक्षितांनी व्हॉटॲप,फेसबुक,ट्वीटर सोशल मिडीयावरुन काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडी सरकारबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रकार परिषदेस क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे सुरेश पाटोळे, पंढरपूर चे नगरसेवक कृष्णा वाघमारे, सुनील जगताप, रोहित कांबळे, महादेव भोसले, रोहित खिलारे, अनिल गवळी, बाळासाहेब बागाव, उदय जाधव आदी मातंग समाज बांधव उपस्थित होते.
*********************************************
चालू 2020 हे वर्ष लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून अशा वेळेस जर मातंग समाजातील कुठल्याही एका व्यक्तीला विधानपरिषदेवर संधी दिली असती तर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असते. - रामभाऊ वाघमारे (मातंग समाजाचे नेते )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा