कोरोनाच्या काळात खालावलेल्या मनाला उभारी देण्याचे काम फक्त किर्तनच करू शकते - ह. भ. प. पठाडे महाराज.
श्रीपती माळी यांची पुण्यतिथी साजरी.
कन्हेरगांव/प्रतिनिधी धनंजय मोरे
गेल्या सात आठ महिन्यांपासून खालावलेल्या मानसिकतेला उभारणी देण्याचे काम फक्त किर्तनाच्या माध्यमातून होवू शकते, कोरोनाच्या काळात लोकांना टि. व्ही. ,मोबाईल चा अतिवापर सुरू झाला आहे. ते टाळून पुस्तके, ज्ञानेश्वरी वाचण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर पठाडे महाराज यांनी केले आहे.
श्रीपती माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपळवाटे तालुका माढा येथे समाजप्रबोधनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर पठाडे महाराज कर्जतकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मेल्यावर श्राद्ध तर कुणीही करत आहे, परंतु जिवंतपणी आईवडिलांची सेवा करा, घरात एकी ठेवा, सासु सुनेने मायलेकी सारखे रहा.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, बाळराजे माळी, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत पाटील, संचालक लक्ष्मण खुपसे, पुणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश खुणे, तानाजी झोळ,कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, केतुर चे माजी सरपंच अशोक पाटील, राजेंद्र बाबर,रिटेवाडी सरपंच दादा कोकरे, भोसे चे सरपंच भोजराज सुरवसे, गुरसोळी चे सरपंच दत्ता अडसुळ, युवराज गपाट, उपसरपंच शरद पवार, बोरगाव चे सरपंच विनय ननवरे, गौतम ढाणे, बाबासाहेब चोपडे, नेरले चे सर्जेराव काळे,भास्कर भांगे, भरत खुपसे, दिलीप खुपसे, प्रशांत खुपसे, कुमार घाडगे, दादा घाडगे, सुनील देवडकर, श्रीमंत घाडगे, पोपट घाडगे, सुदाम माळी, विठ्ठल माळी, सावता माळी, संजय माळी, नागनाथ माळी, उत्रेश्वर माळी, नामदेव घुगे, त्र्यंबक ननवरे, भैरू जगताप आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा