तालुक्यातील कारखान्यांनी पहिली उचल तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोल; शेतकरी संघर्ष समिती व स्वाभिमानीची मागणी
करमाळा तालुका प्रतिनिधी
(अतुल वारे पाटील)
करमाळा तालुक्यातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने चालू झाले असूनही एकाही साखर कारखान्याने या हंगामातील पहिली उचल दिलेली नाही. ती तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत देण्यात आला.
केंद्र सरकारने जी 3 विधेयके शेतकऱ्यावर लादली आहेत त्याला विरोध करण्यासाठी करमाळा येथे शेतकरी कामगार संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना , संभाजी ब्रिगेड यांची संयुक्तपणे विचारविनिमय साठी बैठक झाली. यावेळी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यावी, करमाळा तालुक्यामध्ये साखर कारखान्यांनी या एफ.आर पी. प्रमाणे पहिली उचल व मागील राहिलेली ऊस बिले देण्यात यावी , शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेले कर्ज ,वाहन मालकावर घेतलेले कर्ज आणि साखर कारखान्यातील कामगारांच्या नावे घेतलेले कर्ज या विषयावर बैठकीत चर्चा झाली. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी गोडगे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक तालुकाध्यक्ष अमोल घुमरे,अण्णासाहेब सुपनवर,अनिल तेली,बापू फरतडे,दीपक शिंदे,बाळासाहेब कांबळे, चत्रभुज ईरकर,भीमराव येडे,हनुमंत राऊत,प्रकाश काळे,बाळासाहेब माने,अभिजीत सस्ते आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा