*जालना जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम?*
===============
*जालना प्रतिनिधी मनीषा मगरे
*राज्य शासनाने राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत पुढे
ढकलण्याचा आदेश जारी केला आहे. जालना जिल्ह्यासह राज्यातील ज्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. अशा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमनुसारच होणार आहे.शिवाय सरपंचपदाचे आरक्षण देखील कायम राहणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली नव्हती अशा जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. दरम्यान, सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवरून जालना जिल्ह्यातील इच्छुक भावी सरपंच मंडळींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. जालना जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अशा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण कायम राहणार असंल्याच सरकारी सूत्रांनी समजते?
===============
================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा