रयत शेतकरी संघटने च्या वतीने मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांना निवेदन
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई दि, ( प्रतिनिधी ):- मराठवाडा तथा राज्यातील सर्व जनतेच्या प्रश्ना बाबत प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांना निवेदन मार्फत सुचना देण्यात आले आहे.खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील सह राज्यातील शेतकरी बांधवांचे पिक विमा सरसकट लागू करण्यात यावे.
व महाराष्ट्रातील पी. एम . किसान योजनेची वसूली रद्द
करण्यात यावी. आणि राज्यातील सर्व माफित न आलेल्या शेतकरी बांधवांना सरसकट दोन लाख रुपये तात्काळ देण्यात यावे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा ५ टक्के निधी तथा जागा तात्काळ वाटप करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
राज्यातील लाईट बिलास ३१ मार्च पर्यंत वाढ द्या. व सर्व वीज कनेक्शन तात्काळ सुरू करा.
मौजे सिंदखेड येथील पाणलोट भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
तुळजाभवानी मंदिर पुरातन असून गायरान
पांदीतील रस्ता लोकवर्गणीतून गावकरी करण्यास तयार असून तहसिल व पोलीस संरक्षण देवून तिर्थक्षेत्र विकास निधीतून डांबरी करण्यासाठी ३ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावा
अशा विविध मागण्या संबंधित विभागाला मान्य करून मान्य करण्यात यावे. नसता रयत शेतकरी संघटना व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गेवराई तहसील कार्यालय समोर बुधवार दि. २४ / फेब्रुवारी २०२१ रोजी पासून बेमुदत उग्र असा आंदोलन करण्यात येईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा