Breaking

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

सर्वांगसुंदर जीवनासाठी माणसांवर आणि स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा - रोहित चौधरी*



*सर्वांगसुंदर जीवनासाठी माणसांवर आणि स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा - रोहित चौधरी*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

आयुष्य  सर्वांगसुंदर बनण्यासाठी तसेच सुंदरतेने जगण्यासाठी माणसावर प्रेम केले पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी केले. मोरवड विद्यालयात गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब ढाणे,बाळासाहेब राख उपस्थित होते.
          यावेळी विद्यार्थ्यांसमोर पुढे बोलताना  ते म्हणाले की,  
सहिष्णुता, सेवा आणि मानवता ही मूल्ये आयुष्यभर आपण जपली पाहिजेत.
मानवी व्यक्तिमत्व हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर जीवनाची सार्थकता अवलंबून असते. ज्ञान हे नव्या जगाचे भांडवल आहे.
ज्ञानाने संपन्न असणारी तरूणाई घडविण्यासाठी शिक्षकांनी ग्रंथव्यासंग जपला पाहिजे,आजच्या जागतिकीकरणाच्या काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे सारे विश्व माणसाच्या घरात आले आहे. पण माणूस माणसापासून दुरावत चालला आहे.
परस्परातील संवाद तुटत चालले आहेत. विश्वास आणि प्रेम हाच सुंदर जगण्याचा खरा गुरूमंत्र आहे. जीवनाच्या विचित्र चित्रात ज्याला रंग भरता येतात त्याच्या जीवनाचे चित्र आपोआप सुंदर होते, असेही रोहित चौधरी म्हणाले.यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या कल्पक विचारातून इ. १० वी मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना  बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोहन गजेंद्र नाळे यास ३००० रु रोख व सन्मानपत्र,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु .मोहिनी सीताराम कुदळे हिस, २००० रु रोख व सन्मानपत्र व तृतीय क्रमांकाचे बक्षीस कु. वैष्णवी बाळासाहेब राख हिस,१००० रु रोख व सन्मानपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. 
    या वेळी बोलताना गणेश करे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करावे. महापुरुषांची तत्वे अंगिकारून समाजातील दुःख ,दारिद्र्य निवारणासाठी प्रयत्न दूर करण्याची खूणगाठ मनात बांधून ज्ञानार्जन करण्याचे मौलिक आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.तसेच या बक्षीसांची परंपरा कायम सुरू राहणार असेही सांगितले.पुढच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवावीत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुख्याध्यापक  नवनाथ मोहोळकर सर यांनी केले.सूत्रसंचालन  बाळासाहेब बंडगर यांनी केले.आभार गणेश गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , कर्मचारी, ग्रामस्थ तसेच  विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा