Breaking

बुधवार, २४ मार्च, २०२१

अवकाळी पावसामुळे बालाघाटावरील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, -- डाॅ.गणेश ढवळे


अवकाळी पावसामुळे बालाघाटावरील  नुकसानग्रस्त पिकाचे  पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,  -- डाॅ.गणेश ढवळे 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
_____________________________
 अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे  बालाघाटावरील लिंबागणेश, चौसाळा, नेकनुर महसुल मंडळातील 
 मधिल झालेल्या शेतक-यांच्या पिकांचे स्थळपंचनामे महसुल व कृषिविभागातील आधिकारी,कर्मचाऱ्यांनी  करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हा कृषि आधिकारी यांच्या मार्फत कृषि मंत्रालय प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

सविस्तर माहीतीस्तव:-
 आधीच कोरोनामळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांचे  गेल्या  3 दिवसापासून अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असुन त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून मोठ्या अडचणींना तोंड देत आहे, 
बालाघाटावरील लिंबागणेश, चौसाळा, नेकनुर आदि महसुल मंडळातील 
 शेतक-यांच्या शेतातील गहु, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका तसेच फळबागा खरबुज, टरबुज, आंबा, मोसंबी, डाळींब, आदि शेतमालाचे अवकाळी पाऊस व गारपिठीने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे महसुल व कृषि विभागा मार्फत स्थळपंचनामे करून तात्काळ  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा