Breaking

मंगळवार, २३ मार्च, २०२१

*आण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की…**महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला उद्याचा सुर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर केले नाही तर दुसऱ्या दिवशीचा सुर्य अण्णासाहेब पाटील बघणार नाही,*



*आण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की…*

*महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला  उद्याचा सुर्य उगवण्याच्या आत आरक्षण   जाहीर केले नाही तर    दुसऱ्या दिवशीचा  सुर्य अण्णासाहेब  पाटील बघणार नाही,* 
 
*प्रतिनिधि :जीवन भोसले (उदगीर)*

 *उदगीर*: मी अण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की, या महाराष्ट्र सरकारने जर मराठा समाजाला  उद्याचा सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर केले नाही तर दुसऱ्या दिवशीचा सुर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही.  दुसऱ्या दिवशी सरकारने आरक्षण जाहीर न केल्यामुळे कै.आ.अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:वर गोळी झाडून समाजासाठी बलिदान दिले. गेल्या 39 वर्षापुर्वी मराठा समाजासाठी बलिदान देणारे आमदार अण्णासाहेब पाटील कुठे व सध्याचे सत्तेसाठी लाचारी स्विकारणारे आमदार कुठे. राज्यात बहुसंख्येने असणाऱ्या मराठा समाजाला आजही आरक्षणासाठी झगडावे लागत आहे ही बाब दुर्दैवी आहे.
22 मार्च 1982 ला आमदार अण्णासाहेब पाटील यांनी शपथ घेतली होती की, उद्या जर मराठा समाजाला आरक्षण जाहिर केले नाही तर मी उद्याच्या सुर्य पाहणार नाही. परंतु या सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले नाही. यामुळे 23  मार्च 1982 ला त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. या घटनेला आज 39 वर्ष झाली तरीही आज पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. राज्यात मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही मराठा समाज हा सध्या मोठ्या संकटात सापडलेला आहे. शिक्षणासाठी अर्थिक परस्थिती सक्षम नाही, मुला-मुलींच्या लग्नासाठी पैसे नाहीत, कुटूंबाचा गाडा चालवण्यासाठी विविध समस्या यासह इतर समस्या सध्या मराठा समाजाला समोर उभ्या टाकल्या आहेत. वारंवार मराठा आरक्षणासाठी मोर्च, आंदोलने, बलिदान यासह इतर मार्गे आंदोलने करुनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यात सर्वात जास्त मराठा आमदारांची व खासदारांची संख्या आहे. या मंडळीने जर ठरवले तर एका दिवसात मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. परंतु या सर्व मंडळींनी सत्तेसाठी लाचारी स्विकारल्याचे दिसुन येत आहे. यामुळे आज मराठा समाज मोठ्या संकटात सापडला आहे. 39 वर्षापासुन मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कै.आ.अण्णासाहेब पाटील यांना सर्व मराठा समाजाच्या वतिने विन्रम अभिवादन…
मराठा समाजाचे दुर्दैव!
राज्यात मराठा समाजाची संख्या बहूसंख्य आहे, हा वर्ग पुर्वी अर्थिक बाबीत सक्षम होता. परंतु सध्या मराठा समाजाची परस्थिती बिकट झालेली आहे. ग्रामिण भागातील मराठा बांधवांना रोजगारासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे. यासह अल्प पावसामुळे शेतीतुन म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. यासह विविध समस्यानिर्माण झाल्यामुळे मराठा समाज दिवसेंदिवस मोठ्या घाईत जात आहे. या वर्गाला या घाईतुन बाहेर काढण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न आज पर्यंत कुणी केल्याचे दिसत नाही. राज्यात मराठा आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु  ही सर्व मंडळी पक्षाची बांधील असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात हा सर्व मंडळींने समाजला आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. तसे जर झाले तर खऱ्या अर्थाने कै.आ.अण्णासाहेब पाटील यांना तीच आदरांजली असेल…

*********************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा