ज्वारी पिकाला पाणी देतांना विजेचा शॉक लागून शेतकरी युवकाचा मृत्यू
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट तालुक्यातील झळकवाडी येथील नारायण भगवान वानोळे वय २८ असून दि.१४ मार्च रोजी दुपारी१२:३० च्या दरम्यान स्वतः च्या शेतातील ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता.त्या दरम्यान पाण्यात वीज प्रवाह होऊन जागीच मृत्य झाला.मृतक इसम नारायण वानोळे हे हदगाव येथील आय.टी.आय.येथे गेट वाचमन म्हणून कार्यरत होता.मागील २९ जानेवारी रोजी दुचाकी व आटोच्या धडकेत वडील भगवान वानोळे यांचे मृत्यू झाले होते.करिता शेतातील कामे प्रलंबित असल्याने ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी तल्हारी शिवारातील स्वतःच्या शेतात गेला होता.या दरम्यान शेतातल्या विद्युत तारातून शरीरात विजेचा प्रवाह झाला आणि नारायण वानोळे यांचे जागीच मृत्यू झाले.या घटनेचे माहिती दत्ता वानोळे यांनी ईस्लापुर पोलीस स्टेशन येथे कळविले.
ही घटना कळताच.सपोनि योगेश बोधगिरे सह सपोउनि ए.ए.शेख.एन. एस.पांचाळ,एस.बी.डांगे, महावितरण चे.आर.ऊ वाठोरे यांनी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा करण्यात आला.व मृतदेह प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे नेण्यात आले.व सायंकाळी ठीक ५ वा शव विच्छेदन करून प्रेत परिवाराला देण्यात आला.या घटनेची ईस्लापुर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली.जानेवारी २९ ते मार्च १४ या दोन महिन्यांच्या कालावधीत एकाच परिवारातील दोन प्रमुख व्यक्ती दुर्घटनेत मृत्यू पावल्याने झळकवाडी व शिवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा