Breaking

रविवार, २८ मार्च, २०२१

लॉकडाऊन नको म्हणत गढीच्या शेतकऱ्यांनी भरविला बाजार

लॉकडाऊन नको म्हणत गढीच्या शेतकऱ्यांनी भरविला बाजार*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या 10 दिवसाच्या लॉकडाऊनला काहींनी विरोध केला आहे.
लोकांच्या या आक्रमक भूमिका पुढे प्रशासनाने नमते घेत लॉकडाऊन 30 मार्च नंतर हळूहळू शिथिल करण्यात येईल असे आश्वासन दिले. 
परंतू काही व्यावसायिकांनी होळी धुली वंदन सणासाठी खरेदी केलेले साहित्य बाजार बंद असल्यामुळे घरातच पडून रहात आहे. 
आणि याचा सर्वात जास्त फटका लहान दुकानदारांना जे हातावर पोट भरतात यांना बसत आहे. 
त्यामुळे कोरोनची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासन कडक नियम न लावता लॉक डाऊन करुन सर्वसामान्यांची घरे उद्वस्त करत आहेत अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेकडून येत आहेत. 
सरकारनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल पण आम्हाला लॉकडाऊन नकोय असे व्यापारी व शेतकरी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा