*शर्जिल उस्मानी ला त्वरित अटक करा.......धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चा ची मागणी*
*धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले*
*तुळजापूर तालुका प्रतिनिधी/रुपेश डोलारे , धाराशिव*
तुळजापूर प्रतिनिधी.
पुण्यात येऊन ज्या शार्जिल उस्मानी ने हिंदूंबद्दल 'सर्व हिंदू सडलेले आहेत असे अपशब्द वापरले', त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा ने सातत्य पूर्ण पाठपुरावा केला,भाजयुमो प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या माध्यमातून प्रचंड पाठपुराव्यानंतर एफआयआर दाखल केली गेली;यावेळी कलम १५३ अ दाखल केले गेले.परंतु सदर विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांच्यावर २९५ अ व इतर तत्सम गुन्हे दाखल करणे ही अपेक्षित होते परंतु,ते करण्यास सरकारकाडून टाळाटाळ करण्यात आली. यावरून राज्य सरकार सर्जिल उस्मानी ला जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.
सर्जिल उस्मानी पाताळात लपला असेल तरी आम्ही त्याला शोधून आणू अश्या वल्गना करणाऱ्या सरकारने तो मुंबई मध्ये येऊन ही त्याला अटक केली नाही,तसेच अटक करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका न्यायालयात घेतली, यावरून सरकारची भूमिका किती नकारात्मक आहे हे स्पष्ट होते.
अश्या हिंदू द्वेष्ट्या धर्मांध शक्तींना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकार चां आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून जाहीर निषेध करीत आहोत आणि उस्मानीला त्वरीत अटक करून त्याच्यावर २९५अ आणि लागू होणारी तत्सम सर्व कलमे लावावीत अशी मागणी करीत आहोत व जर लवकर आरोपीला पकड़ला नाही तर भाजयुमो तीव्र आंदोलन करेल राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो यांनी सदर निवेदन देताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ,याप्रसंगी संदीप इंगळे ,बँटी मुंडे ,ओम नाईकवाड़ी ,सुराज शेरकर ,प्रसाद मुंडे ,तानाजी माने ,गणेश एडके ,राहुल पवार ,आशुतोष साठे ,सौरभ घुगे ,रंजीत कदम इत्यादि सहकारी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा