*राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केलं.
सविस्तर.... 👇
कोरोनाचा शिरकाव होऊन वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात या कोरोनाला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.
पण लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोना वाढला.
राज्यात रोज अडीच लाख चाचण्या करणार आहे. तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार आहेत.
70 टक्के आर्टीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. तर राज्यात लॉकडाउनची स्थिती अजूनही टळलेली नाही.
आज राज्यात 45 हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही.
राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील, त्याबाबत उद्या परवा जाहीर करु. गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी.
तर बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल.
रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. दोन - तीन दिवसात मी पुन्हा बोलेन.
मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा