*उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटने तर्फे जिल्हाधिकारी उस्मानाबाद याना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले*
उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना महामारी असल्याने ग्राहकांचा अंगठा न लावता, दुकानदाराचा अंगठा लावण्यात यावा, तसेच 50 लाखाचा विमा कवच देण्यात यावे, या मागणीसाठी दिनांक 26 एप्रिल 2021,रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच,
दिनांक,1/05/2021 रोजी पासून सर्व रास्त भाव धान्य दुकानदर संपावर जात असले बाबत व कोरोना या आजरापासून रास्त भाव दुकानदार व त्यांच्या मदतनीस याना,50 लाखचा विमा कवच देने बाबत व ग्राहका ऐवजी रास्त भाव दुकानदार याचे थंम्बास तात्काळ मान्यता द्यावी,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,या निवेदनावर जिल्हाध्यक्ष समाधान कदम,महाराष्ट्र सचिव प्रफुल्लकुमार शेटे, जिल्हा सल्लागार काकासाहेब कासार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काझी मुदसिर, तुळजापूर तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव, दुकानदार दाजी माने,सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा