*सोलापूर- तुळजापूर महामार्गावरील ऊळे येथील अरूंद पुल बनतोय मृत्यूचा सापळा,अरूंद पुलाची दुरुस्ती करावी मनोज बचुटे यांची मागणी*
राष्ट्रीय महामार्गावरील तालुका दक्षिण सोलापूर ऊळे या गावानजीक असलेला जुना दगडी पूल न पाडता त्यावरूनच राष्ट्रीय महामार्ग बनविला असून, तो पुल अरुंद असल्याने अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत, हा पुल सध्या धोकादायक झाला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, IRB कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून वाहनांकडून टोल वसुली सक्तीने केली जाते, तरी त्याची निगा राखणे काम देखील त्यांचेच आहे, परंतु येथील अरूंद पुलावरून अपघात होऊन विनाकारण लोक मृत्युमुखी पडत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी यांना माहिती असून देखील त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे यांनी वारंवार निवेदन देऊनही त्या पुलाची दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे,
प्रतिनिधी रूपेश डोलारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा