टेंभुर्णी येथील जुने महामार्गावरील खड्डे बुजवा*......बशीर जहागीरदार
************************************
टेंभुर्णी येथील गावातून जाणारे जूने महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन नविन बायपास झाल्यापासून अंतर्गत महामार्गाची दूरावस्था झालेली आहे. याकडे प्रशासनाचे व महामार्ग प्राधिकरण कार्यालयाचे दुर्लक्ष झालेले आहे. जुने महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत. पावसात अत्यंत बिकट परिस्थिति निर्माण होते, पाणी मुळे रस्ताच दिसत नाही व वाहने त्यामध्ये अडकतात. दोन चाकी वाहनांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. मागील वर्षी पावसात खड्यात पडून एका दुचाकी स्वाराचा मृत्यु देखील झालेला आहे त्या मुळे जुने महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी भरतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सोलापुर यांचेकडे केली आहे.
नविन बायपास झाल्याने जुन्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. जुन्या महामार्गाचे काम मंजूर असून ते काम रखड़लेले आहे. त्याचे नविन टेंडर निघून संपूर्ण रस्ता होण्यास विलंब लागणार आहे. तो पर्यंत लोकांचे हाल होणार आहेत. सदर रस्त्याची दुरावस्था लक्षात घेवून टेंभुर्णी येथील जुने महामार्गाचे खड्डे तातडीने बुजवने गरजेचे आहे. बायपास ते बायपास जुने महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे ही मागणी केलेली आहे.जुने महामार्गाचे मंजूर असलेले काम झाले असते तर आज रस्त्याची ही अवस्था झाली नसती.नविन महामार्ग झाल्याने टेंभुर्णी येथील जुने महामार्गावरील व्यवसायकांचे आतोनात नुकसान झाले आहे त्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने जे वाहने गावातून येत होते ते देखील येत नाहीये.त्यामुळे टेंभुर्णीकरांचे दुहेरी नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जुने महामार्गाचे मंजूर असलेले काम सुरु होण्यास प्रशासनाची दिरंगाई होत आहे त्यामूळे अंतर्गत रस्त्याचे खड्डे बुजवने महत्वाचे आहे.होणारे अपघात टाळणे महत्वाचे आहे,व्यापारीवर्गांचे व्यापार चालणे गरजेचे आहे त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने अर्जाचे विचार करुन तातडीने जुने महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवणयाची विनंती बशीर जहागीरदार यांनी केली आहे.सदर निवेदनाचे प्रती चेअरमन महामार्ग प्राधिकरण,नवी दिल्ली, विभागीय आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी सोलापुर यांना पाठविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा