*कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा तर जनतेनेही स्वःताची काळजी घ्यावी - माजी आयुक्त प्रभाकर देशमुख*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
संपूर्ण राज्याबरोबर माण- खटाव मध्येही कोरोनाची दुसरी लाट अतिशय भीषण असं स्वरूप धारण करू लागलेली आहे. माण- खटावमधील गावामध्ये जो मला फिडबॅक येतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून येते आहे. लोधवडे गावामध्ये आज ५० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पोझिटीव्ह आहेत. अशी अनेक गावं आहेत, ज्या गावामध्ये अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव झालेला आहे. कोरोनाचा उद्रेक म्हणावा लागेल. याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली असून काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे सुचीत केले असून जिल्हाधिकारी यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तर जनतेने सुध्दा स्वःताबरोबर इतरांची ही काळजी घेणे गरजेचे आहे असे मत श्री.देशमुख यांनी केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ज्या गावामध्ये २० पेक्षा अधिक रुग्ण आहेत अश्या रुग्णांचे त्या गावात शाळेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी विलगीकरण करून, त्याठिकाणी बोलावून त्यांची चाचणी घेऊन त्यांना औषध उपचार करणे, त्याठिकाणी लोकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात यावी, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना आणि गावातील इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. यासाठी आवश्यक ते अंतर ठेवून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्या घरामध्ये रुग्ण आहेत त्या ठिकाणी "विलगिकरण करणं" हे प्रत्यक्षात केलं जात नाही किंवा शक्य होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होतोय असं चित्र आहे. त्यामुळे ज्या गावात अशा प्रकारे कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असेल त्या गावामध्ये त्यांच्या राहण्याची, जेवणाची, व्यवस्था करणे एवढेच नाही तर त्या प्रत्येक गावांसाठी डॉक्टरांची व्यवस्था करून डॉक्टरांनी शासनाच्या वतीने दिले जाणारे औषध उपलब्ध करून देणे त्याचबरोबर ग्रामपंचायतीने जर आवश्यक ती औषधे कमी पडत असतील तर ती ग्रामपंचायतीच्या निधीमधून उपलब्ध करून दयायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टरांची मदत घेणं व अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी ही केली आहे. ज्या माध्यमातून चांगली ट्रीटमेंट पेशंटला दिली जाईल व ते लवकर कोरोनामुक्त होईल यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सध्याच्या चालू परिस्थितीत असं दिसतंय की लोकांच्याकडून अंतर पाळणं आणि मास्क वापरणं यांच्यामध्ये कुठंतरी कमतरता होत आहे. या भीषण परिस्थिती मध्ये आपण आपली काळजी घ्यायला हवी, सुरक्षित अंतर ठेवायला पाहिजे, मास्क वापरणे आवश्यक असून वेळेत औषधउपचार केले पाहिजेत. आपल्या लक्षात आल्यावर पहिल्या ४ ते ५ दिवसात औषधोउपचार केला तर कोरोना १०० टक्के बरा होतो. असं तज्ज्ञ डॉक्टरांचं मत आहे. पण दुर्दैवाने लोकं उशिरा तपासणी करून औषधोउपचार सुरू करतात. दुखणं अंगावरती काढतात. त्यामध्ये प्रामुख्याने तरुणांची संख्या मोठी दिसत आहे. कारण तरुणांना सुरुवातीच्या काळामध्ये ७ - ८ दिवसात आपल्याला काही होत नाही अशा प्रकारची भूमिका ते घेतात आणि त्या पिरियड मध्ये कोरोनाची जी लागण आहे ती वेगाने वाढते आणि मग त्यानंतर नियंत्रण करणं शक्य होत नाही. अश्या प्रकारे डॉक्टरांनी आणि तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. आताच्या या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण मुलं मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात या रोगाला बळी पडताहेत. असं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यावेळी आपल्याला थोडी जरी लक्षणे दिसली तर आपण ताबडतोब टेस्ट करून घेणं आणि ताबडतोब उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. हे उपचार जर तातडीने सुरू केले, तर निश्चितपणे कोरोनावरती आपाल्याला मात करता येईल. यासाठी सुरक्षित अंतर ठेवणं, वेळेवरती उपचार करणे व ज्यांना लागण झाली आहे त्यांना विलगी करणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती आहे.
गेले अनेक दिवस माण खटावमधील अनेक गावातील पेशंटसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे तसेच रेमडीसीवर इंजेक्शनची उपलब्धता करून देणं, सकाळपासून सायंकाळ पर्यंत वेगवेगळ्या हॉस्पिटल आणि अधिकाऱ्यांशी बोलून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. परंतु याच्यामध्ये मागणीपेक्षा सुविधांची खूप कमी उपलब्धता असल्याचे ( जास्त पेशंट व बेडची संख्या कमी ) लक्ष्यात येत आहे आणि म्हणून आपणास कोरोनाची लक्षणे दिसल्यावर तातडीने उपचार करुन घ्यावेत. जिद्द व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला कोरोनावर मात करायची आहे अशी माहिती माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा