*ग्रामविकासासाठी भरीव योगदानामुळेच राज्य शासनाकडून सन्मान- तात्यासाहेब पाटील*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
ग्रामविकासामधील भरीव योगदान दिल्यामुळे आपला राज्य शासनाकडून आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव झाला असून यापुढेही असेच काम करत राहणार असल्याची ग्वाही राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक तथा मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी करमाळा येथे बोलताना दिली.
करमाळा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी श्री पाटील बोलत होते.
यावेळी मराठा सेवा संघ माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,ग्रामसेवक संघ पतसंस्था सोलापूर चे चेअरमन रामभाऊ मिटकल, ग्रामसेवक नवनाथ दोंड, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोगरे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष अजित कणसे,तालुका सचिव संतोष शितोळे, संभाजी ब्रिगेड तालुका सचिव गणेश डोके,ऍड रोहित घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तात्यासाहेब पाटील म्हणाले की, गावाच्या विकासात सरपंचाच्या जोडीला ग्रामसेवकाची खंबीर साथ मिळाली तरच गाव प्रगतीपथावर जाते. ग्रामसेवकाकडे गावाची विकासाची विधायक दृष्टी असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाचा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्यावर असल्याने आदर्श ग्रामसेवक घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष अजित कणसे यांनी तात्यासाहेब पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.तात्यासाहेबांसारखे ग्रामसेवक गावाला मिळाल्यास गावाची विकासाकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन केले.
मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सचिव सचीन शिंदे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा