उजनी धरणात आलेले 5 Tmc सांडपाणी याचा कलर कोणता पालकमंत्र्यांनी सांगावे - प्रभाकर (भैय्या)
भिमानगर प्रतिनिधी/ धनंजय भोसले
भिमानगर येथील उजनी धरणाच्या गेटवर जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाचा आज 3 रा दिवस आहे.या प्रसंगी बोलताना प्रभाकर भैय्या देशमुख म्हणाले पालकमंत्री यांनी उजनीत येणारे 5 टीएमसी पाण्याचा कलर कोणता हे सांगावे या आंदोलना मध्ये प्रहारचे दत्ता भाऊ व्याव्हारे , व संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप यांचा सहभाग आहे.भीमानगर येथील उपकार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देऊन 5 टीएमसी पाणी जे इंदापूरला जाणार आहे ते रद्द करावे या मागणीचे निवेदन दिले. नंतर त्यांनी खडकवासल्याच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी स्वरूपात पाटवले आहे की उजनी धरणाच्या गेटवर समोर चालेल्या आंदोलनाला प्रतेक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी यांची एक प्रत जनहीत शेतकरी संघटनेला चालेल्या आंदोलन स्थळी प्रतेक्ष भेट देऊन आंदोलकांना लेखी प्रत दिली.
त्याच वेळी राज्याचे मुखमंत्री ,जलसंपदा मंत्री मुख्य अभियंता व सोलापूर अधीक्षक अभियंता यांना जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
की उजणी धरणात हे 5 टी एम सी पाणी कधी येते ते कोठे आहे व त्याचा रंग कोणता आहे याचा खुलासा पालकमंत्री व संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी प्रभाकर भैय्या देशमुख यांनी लावून धरली आहे.या 3 दिवसात अधीक्षक अ भियंता सोलापूर यांनी लेखी खुलासा आम्हाला द्यावा अन्यथा कार्यलयात घुसून उग्रस्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा