*वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे लाईनमन चा बळी; दोषींवर कारवाईची ग्रामस्थ व स्वाभिमानीची मागणी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील रावगाव मध्ये आज विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका निष्पाप लाईन मेन कामगार नितीन पाटील यांना जिव गमवावा लागला आहे.रावगाव ग्रामस्थ तसेच स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावगाव आणि वंजारवाडी या गावांना विज पुरवली जाते ति मेन लाईन चाळीस वर्षे जुनी आहे .या लाईन वर जर पूर्ण दाबाने वीजप्रवाह सोडला तर लाईन ट्रीप होते म्हणून या गावांना एक दिवसा आड लाईन सोडून वीज पुरवठा करण्यात येतो. वंजरवाडी , रावगाव , शेळके वस्ती, धगटवाडी आदी गावांना आळीपाळीने वीजपुरवठा करण्यात येतो.असे असताना आज शेळके वस्ती धगटवाडी लाईनजोडत असताना अचानक वीज प्रवाह चालू होऊन नितीन पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार कोण हा प्रश्न गावातील व पंचक्रोशीतील लोकांच्या मनात आहे .याचे उत्तर प्रशासनाने व एम एस ई बी ने द्यावे व जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जे मृत आहेत वायरमन त्यांना लहान लहान मुले आहेत याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न जमलेल्या लोकांमधून करण्यात आला .त्या वेळी वीज वितरण अधिकारी यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर मृतदेह खाली घेण्यात आला. परंतु ही लाईनचे काम जर झाले नाही तर आणखीन कितीतरी लोकांचे बळी जाऊ शकतात. याची दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी तसेच नितीन पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रावगाव ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा