*वडूज नगरपंचायतीने सुसज्ज स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे - शहाजीराजे गोडसे*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन निद्रावस्थेत असून जर येणाऱ्या पाच दिवसात त्यांना जाग आली नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे मुख्याधिकारी यांना आयसोलेशन सेंटर मध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हणाले आहे की, कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने वडूज शहरात धुमाकूळ घातला असताना शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी हे चूल धरून घरात बसले आहेत. गेल्या वर्षे भरात कचरा टेंडर साठी स्वतंत्र मिटिंग झाली परंतु कोरोनासाठी एकही मिटिंग नगराध्यक्ष यांनी बोलावली नाही. वडूज शहरातील नागरिकांना हक्काचे बेड उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. वास्तविक यापूर्वी नगरपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून किंवा न प फंडातून वडूज शहरासाठी स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते. सध्या शहरातील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी सातारा, कराड, फलटण आदी ठिकाणी धडपड करावी लागत आहे.
गेल्या दोन वर्षाभरापूर्वी आम्ही आमच्या मित्र मंडळातर्फ़े जन आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर नगरपंचायतीने नवीन शववाहिका वडूजकरांच्या सेवेत सुरू केली. मात्र आता नगरपंचायत या शववाहिकेसाठी वडूज मधीलही नागरिकांकडून बेसुमार फी आकारात आहे. शहरात कोरोनोच्या थैमानावर नगराध्यक्ष यांनी विशेष सभा बोलावणे गरजेचे असताना गेले वर्षेभरा पासून एकही सर्वसाधारण सभा बोलावली नाही. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधीचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. शहराची लोकसंख्या पाहता नगरपंचायतीने यापूर्वी कोरोना हॉस्पिटल उभारून जनतेला दिलासा देणे गरजेचे होते. शहरातील नागरिकांनाकडून विविध कर प्रकारातून कोट्यावधी रुपये नगरपंचायत गोळा करत आहे. वडूज शहरासाठी कोविड हॉस्पिटल उभारणे गरजेचे असताना येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटर उभारून यापूर्वी नगरपंचायतीने नौटंकी केली. त्या कोरोना सेंटरचा फायदा वडूज शहरातील नागरिकांना होताना दिसत नाही.
शहरातील नागरिकाना हॉस्पिटल हे युद्धभूमी वाटत असताना नगरपंचायत ही केवळ दिखाव्याच्या कामावर खर्च करत आहे. शहरात आज चार ते पाच डझनच्या आसपास डॉक्टर सेवा देत आहेत. नगरपंचायतीने नवीन कोरोना हॉस्पिटल उभारून शहरातील डॉक्टराना सेवा देण्यासाठी साद घातली पाहिजे. तरच शहरातील नागरिकांचे हाल कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. नगरपंचायतीने येणाऱ्या पाच दिवसात हॉस्पिटल उभारले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याचा गर्भित इशारा शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.
चौकट
*नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देऊन घरी बसावे*
गटारे,रस्ते,स्मशानभूमी,हायमास लॅम्प,कचरा टेंडर अश्या मलाईदार कामामध्ये कायम व्यस्त राहणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वडूज मधील नागरिक हाल होऊन मरत असताना देखील पाझर फुटत नाही त्यामुळे अश्या नाकर्ते लोकप्रतिनिधीनी येणाऱ्या निवडणूकीत जनता रस्त्यावर आणून योग्य ती जागा दाखवेल.
विजय गोडसे वडूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा