*पिंपळा खुर्द येथील कर्जबाजारी शेतकऱ्याला मिळाला न्याय,*
*अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संगर्ष समितीचे जि.अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश*
दि, 24 मे 2021 रोजी, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले होते, या निवेदनात शेतकऱ्यांनी असे नमूद करण्यात आले होते की, बब्रुवान हरिबा निकम रा, पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर येथील असून याच गावामधील गट क्रमांक 135 मध्ये त्यांची 5 एकर जमीन आहे, पाच ते सहा वर्षांपूर्वी डिमांड भरलेले असून, मागील दोन महिन्यापासून शेतातील वीज कट करण्यात आले होती, या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, त्यावरून जनशक्ती टीव्ही न्यूज चैनलने दिनांक 24 मे 2021 रोजी वृत्त प्रसारित करताच व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी पाठपुरावा केल्याने दिनांक 28 मे 2021, रोजी कर्जबाजारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडण्यात आले, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा