*महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघाच्या सरचिटणीस पदी आनंद माने यांची निवड .*
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार संघाच्या सरचिटणीस पदी कामगार चळवळीचे तरुण युवा नेतृत्व आनंद माने यांची बिनविरोध निवड संघाचे अध्यक्ष आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार संघ ही राज्यात माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव प्रभावी संघटना आहे.या संघटनेत आनंद माने हे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत गेल्या दहा वर्षात आक्रमक कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे आनंद माने हे माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम तन-मन-धनाने करतात आनंद माने हे केंद्र सरकारच्या आयकर विभागात सरकारी नोकरीत होते नोकरी करत कामगार चळवळ चालवत होते परंतु सरकारी नोकरीमुळे अनेक बंधने येत होती कामगार हक्काचे आदोलण म्हणजे सरकाच्या विरोधात आदोलण दिसत होते.त्यामुळे आदोलण करण्यांत अडचण येत होती तरीही मुंबई,ठाणे, नवी मुंबई,कोकण विभाग व राज्यात अनेक ठिकाणी सविधानीक मार्गाने आदोलण केले आहे परंतु सततची रजा व सार्वजनिक आदोलण करण्यासाठी सुटी मिळत नाही तरीही मिळेल त्या वेळेत आदोलण केले जास्त अडचण येत असल्याने सरकार समोर झुकावे लागु नये म्हणून सर्वात चांगली सरकारी नोकरी कामगार चळवळ साठी दोन वर्षांपूर्वीच राजीनामा दिला त्यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली चांगली नोकरी सोडली म्हणून तर घरातील सदस्यांनी नोकरी सोडली तर आता काम काय ? करणार अशी चिंता व्यक्त केली परंतु कामगारांसाठी घरदार सोडून ध्येयवेडा मानुस सारखं जगावे या विचाराने कामगार चळवळीत सक्रिय योगदान देत आहेत त्यांच्या कार्याची दखल माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष आमदार भाई बाळाराम पाटील यांनी घेतली या संघटनेचेे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बिनविरोध निवड केली त्यांच्या या निवडीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कामगारांना वेळेवर न्याय मिळावा म्हणून कामगार चळवळ उभी केली आहे आनंद माने यांच्या निवडी बदल अनेक कामगारांनी व बालाजी सलगर,सुनिल धनगर यांनी अभिनंदन केले.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा