*निस्सीम स्वामी समर्थ भक्त विनोद गांधी महाराज यांचे निर्वाण*
वडुज : श्री स्वामी समर्थांचे निस्सीम उपासक प.पू.विनोद गांधी उर्फ गांधी महाराज वय ८१ यांचे आज पलूस जिल्हा सांगली येथे वार्धक्याने निधन झाले.
ते कोरेगाव जि.सातारा येथील सुप्रसिध्द व्यापारी स्व.चतुरचंद गांधी यांचे चिरंजीव होत. वाई येथील स्वामी समर्थांचे सिद्धहस्त शिष्य सदाशिव धोंडो कुलकर्णी उर्फ अण्णा महाराज यांचे संपर्कात आल्यानंतर त्यांनी घरदार सोडूनआयुष्यभर स्वामी समर्थांचीच उपासना केली. ठाणे, बदलापूर, सातारा, दहिवडी, वडूजसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समर्थ उपासना केंद्रे निर्माण केली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा हजारों शिष्यगण आहे. वडूज येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वामी समर्थ मंदिराची निर्मिती झाली आहे. अनेकांचे संसार त्यांनी उभे केले.
त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पलूस येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा