नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी
शशिकांत सोनटक्के,
रेडा प्रतिनिधी
शशिकांत सोनटक्के
इंदापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये गुरुवारी ( दि सायंकाळी झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसाने द्राक्षे, आंबे केळी
डाळिंब पेरू आदी फळबागा विविध पिकांचे व घरांचेही
मोठे नुस्कान झाले आहे,तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी,
अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के यांनी केली,
यावेळी शशिकांत सोनटक्के म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये
रेडणी निमगाव केतकी, बोरी सराफवाडी लाखेवाडी जाधव वाडी, घोरपडवाडी रेडा , वालचंद नगर, बावडा, पिठेवाडी चाकाटी,
गोतंडी शेळगाव, आदी अनेक गावांच्या परिसरात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,
परिणामी, आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे, सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने शेती पिकांना बाजारभाव मिळत नाही,
त्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची भर पडली आहे, त्यामुळे अडचणीतील
शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे,
त्यामुळे शासनाने फळबागांचे शेती पिकांचे, घरांच्या पडझडीचे व इतर नुकसानीची त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तात्काळ देणे गरजेचे आहे.पिटकेश्रर येथे पाॅलिहाऊसचे नुकसान झाले आहे, तसेच वादळी वाऱ्याने ठीकठीकाणी विघुत खांब कोसळले आहेत, अशा ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करून वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी सुचनाही शशिकांत सोनटक्के यांनी केली आहे.दरम्यान आणखी काही दिवस मान्सून पूर्व पावसाची घ्यावी , असे आवाहनही प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के यांनी केले आहे,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा