माळेगाव येथील शिवाजी पाटीलसह ७ आरोपींची खुनी हल्ल्यातून निर्दोष मुक्तता
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील माळेगाव येथे १९९३ साली दोन गटात राजकीय वैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील १२ पैकी सात आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून एका आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.यातील उर्वरित चार आरोपी मयत झालेले आहेत.
माळेगाव येथे १९९३ मध्ये सुभाष यादवराव पाटील यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यात १९९६ मध्ये सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावली होती.यामुळे सर्व आरोपींनी या निकालास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.या खटल्याची १८ मार्च २०२१ रोजी अंतिम सूनावणी होऊन १० जून रोजी निकाल जाहीर झाला.यामध्ये शिवाजी नामदेव पाटील,बापूसाहेब मारुती पाटील,हैबत महादेव गायकवाड,शंकर सिताराम गायकवाड,लहू मुरलीधर गायकवाड, आण्णा मुरलीधर गायकवाड,महावीर मुरलीधर गायकवाड यांची निर्दोष मुक्तता झाली तर इतर पाच आरोपीस दोषी धरण्यात आले.हा खटला २९ वर्ष चालला.या दरम्यान महादेव धोंडीराम गायकवाड,विजय धोंडीराम गायकवाड,पोपट सिताराम गायकवाड,अंकुश आप्पा गायकवाड या चार आरोपींचा मृत्यू झाला.तर एकमेव आरोपी भगवान नारायण गायकवाड यांना पाच वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच फिर्यादी सुभाष यादवराव पाटील यांना नुकसान भरपाई पोटी दोन लाख रुपये देण्याचा आदेश मे.न्यायालयाने दिला आहे.
या गुन्ह्यात आरोपीच्या वतीने ॲड अक्षय गोसावी,ॲड चैतन्य पेंडसे,ॲड शेखर इंगोले,ॲड कुलदीप गायकवाड,ॲड रितेश थोबडे तर सरकार पक्षातर्फे ॲड पी.पी.शिंदे यांनी तर मूळ फिर्यादी तर्फे ॲड एस.आर.फणसे यांनी काम पाहिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा