*शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचे दिशादर्शक,शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे जयंती विशेष-. डॉ शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन*
तुळजापूर,दि ९,जून, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संस्थेचे संस्थापक, संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.शिवाजीराव देशमुख यांनी वरील उदगार काढले,
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, आजमितीला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ज्ञान शाखेतून खूप सारे विद्यार्थी घडले, महाराष्ट्रातील ज्या ज्या विशेषतः ग्रामीण भागात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता तो समाज शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रयत्नातून शिक्षणामुळे मुख्य प्रवाहात आला,ज्ञाना बरोबरच विज्ञानाचे धडे घेउन समाजाला सुसंस्कारीत करण्याचे कार्य बापूजींमुळेच घडुन आले,1954 मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा संकल्प बापुजीनी केला. त्यावेळी त्यांच्याकडे ना राजकीय वलय, ना सामाजिक वलय अथवा घराण्याची उत्तम प्रतिष्ठा. ना धन, ना दौलत अशा कोणत्याही बाबींचा आधार नसताना केवळ आत्मविश्वास, जिद्द आणि खडतर तपश्चर्येच्या जोरावर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उभा केली. महाराष्ट्रात त्यावेळी अनेक संस्था शिक्षणाचे काम करत होत्या. मात्र बापुजीनी, दुर्गम भागात अविकसित प्रदेशात ,आदिवासी भागात, तुळजापूर ,उस्मानाबाद सारख्या ठिकाणी जिथे शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नव्हता तिथे पोहोचून धाडसाने शैक्षणिक केंद्रउभा केली. कसल्याही नफा तोट्याचे गणित न करता जनतेच्या सहकार्याने बापुजी ने शिक्षणाचे जाळे खेडोपाडी निर्माण केले. आपल्या उभ्या आयुष्यात खूप वेदना सहन करून अनेक प्रसंगाला सामोरे जावून या संस्थेचा विकास केला. म्हणूनच खेड्यापाड्यातून लाखो आशेचे किरण स्वयंमप्रकाशित होत आहेत. असे हे बापूजी गांधीवादी विचाराने प्रभावित झालेले खरी स्वातंत्र्यसैनिक होते. प्रिन्स शिवाजी बोर्डिंग मध्ये बापूजी राहत होते. आप्पासाहेब पवारांसारखा शिक्षण तज्ञांच्या सल्ल्यानेच मराठवाड्यात संस्थेच्या काही शाखा निघाल्या. बीड, भुसावळ, परभणी येथे संस्थेच्या काही शाखा काढण्याचा बापूजींचा संकल्प होता. वाईला सुद्धा कॉलेज काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला, पुणे विद्यापीठासमोर उपोषण केलं. परंतु यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा स्थानिकांना असल्यामुळे तिथे कॉलेज त्यांना काढता आलं नाही. परंतु पुढे 1962 ला एल बी एस कॉलेज ची स्थापना करून लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नींना बोलवून त्यांच्या शुभास्ते त्या महाविद्यालयाची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषणात बापूजींच्या कामगिरीचे स्वरूप तर सांगितलेच ,शिवाय शिक्षण संस्था शिक्षकांनी कशा चालवाव्यात याबाबतचे उत्तम उदाहरण म्हणून या संस्थेकडे पाहावे असे ते त्यावेळी बोलले होते.
. समाज आज आधुनिकतेच्या प्रवाहात आहे, परंतु या आधुनिकतेच्या प्रवासात आपण शिक्षणमहर्षी डॉ बापूजी यांचे संस्कारमयी विचार विसरता कामा नये असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच या मंगलदिनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आज वृक्षारोपण देखील करण्यात आले,बापूजींनी ग्रामीण भागात जेवढा साक्षरतेचा प्रसार केला, तेवढाच पर्यावरण संवर्धनाबाबत सजगतेने विचार मांडत राहिले. पर्यावरण व निसर्गात सुधारणा घडून आणण्यासाठी आणि पर्यावरणाची सुस्थिती कायम राखण्यासाठी प्रत्यक्ष कृती वर लक्ष देणे आवश्यक आहे,. आपल्या कृतीमुळे पर्यावरणात काही फरक घडू शकतो ही जाणीव सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावी असे बापूजींना वाटत . आपण शहरात, खेड्यात, डोंगरदऱ्यात, शेतावर, इमारतीत असे कुठेही रहात असलो तरी आपण स्वतः वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे. हा विचार सातत्याने ते मांडत राहिले. हाच उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष कृती हा पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून आम्ही आज वृक्षारोपण केले. यामध्ये प्रामुख्याने नारळ,रामफळ,चाफा,एकझरा,तगर,रबर,अनंता,बेल,करंज फायकस आदी झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. त्यामध्ये पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, हाच संदेश आजच्या दिनी वृक्ष लागवडीतून देण्याचा प्रयत्न केला.यावेळी प्रा.धनंजय लोंढे,प्रा.सविता कदम,प्रा.सतिश वडगावकर,प्रा.आशपाक आतार,प्रा.डॉ.मेजर वाय ए डोके, उपस्थिती होती.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रासेयो विभाग प्रमुख प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी पुढाकार घेतला.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा