Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

शेवरे येथे अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने केले "माती परीक्षणाचे महत्व" याविषयी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन*



*शेवरे येथे अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने केले "माती परीक्षणाचे महत्व" याविषयी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन*

टेंभुर्णी प्रतिनिधी
माढा तालुक्यातील शेवरे येथे अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना 'शून्य ऊर्जा शितकक्षातील फळे-भाजीपाला साठवण','माती परिक्षणाचे महत्व' या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देताना विद्यार्थिनी स्नेहल साठे हिने सांगितले की,काढणी नंतरच्या अयोग्य हाताळणीमुळे दरवर्षी वीस-तीस टक्के भाजीपाला वाया जातो.यासाठी साठे हिने प्रा.एन.बी.गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली 'शून्य ऊर्जा शितकक्षा' चे प्रात्यक्षिक करून दाखविले.या शितकक्षात फळे,भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी कसलेही यांत्रिक,रासायनिक,विद्युत ऊर्जेची गरज नसल्याचे सांगितले.
माती परिक्षणाचे फायदे : -
तसेच जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पीक वाढीसाठी कोणत्या अन्न द्रव्याची कमतरता आहे हे पहिले जात नाही.कमतरता तपासून ती भरून काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.माती परीक्षण विषयक माहिती प्रा.एस.आर.आडत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली.यावेळी माती नमुना कसा घ्यावा,मातीची उत्पादकता सुधारण्यासाठीचे उपाय,अन्न घटकांच्या कमतरतेमुळे पिकावरील लक्षणे याची ही माहिती देण्यात आली.
हा उपक्रम अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहोते-पाटील,समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर,प्राचार्य आर.जी. नलवडे,प्रा.एस.एस.एखतपुरे, प्रा.डी.एस.मेटकरी,प्रा.ए.बी.तमनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी सरपंच लक्ष्मण मस्के,ग्रामसेवक नारायण सोनवणे,रोहन मस्के,अमोल मस्के,रवींद्र मस्के,रुपाली बनसोडे,सत्यभामा कांबळे,अभिमान मस्के,नेताजी साठे आदीजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा