*कोरनाच्या काळात महाआघाडी सरकार कमी पडले... सदाभाऊ खोत*
*टेंभूर्णीतील कोवीड काळात सेवा देणार्या डाॅक्टरांचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने सन्मान. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची ऊपस्थिती*
टेंभुर्णी /प्रतिनिधी
टेंभूर्णीतील कोवीड काळात रूग्णांना कोरोनावर ऊपचार करणार्या डाॅक्टर्स,लॅबोरेटरी चालक,विशेष सेवा दिलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा रयत क्रांती संघटनेच्या वतीने घेण्यात आला.यावेळी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत ऊपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,संपूर्ण महाराष्ट्रात कोरनाच्या पहिल्या लाटेनंतरही आरोग्यविषयक जनजागृती व औषध पुरवठा करण्यात महाआघाडी सरकार कमी पडले.कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये रेमडीसिवर ईंजेक्शन व आॅक्सीजनचा तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.राज्यात जवळजवळ ३ कोटी ६० लाख ७४ हजार रुग्ण कोरोनाग्रस्त झाले.महाराष्ट्राचा कोरोना काळातील मृत्युदर ३.६% म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेने खूप जास्त दर आहे.त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतला,तर १ लाख ७२ हजार रुग्ण कोरनाग्रस्त आहेत.कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या ६ हजारांच्या जवळपास आहे.या आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणजे महाआघाडी सरकार कोरना वरील औषध उपचार पुरवठा करण्यात कमी पडले.सर्व लोक घरात बसले असताना वैद्यकीय डाॅक्टर्स व त्यांचा स्टाफ कोरोनाकाळात रूग्णांवर औषध ऊपचार करत होते.त्या दरम्यानच्या कालावधीत डाॅक्टरांनाही मृत्युला सामोरे जावे लागले.यातही महाआघाडी सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई,विमा,सरकारी नोकरीमध्ये संधी ऊपलब्ध करून दिल्या नाहीत.येत्या अधिवेशनात कोरोनाने मृत्यु झालेल्या डाॅक्टर्स,त्यांचे सहकारी,पत्रकार यांचा प्रश्न शासन दरबारी प्रश्न मांडणार आहे.यावेळी टेंभूर्णी येथील कोवीड सेंटरमधुन कोरोना ऊपचार दिलेल्या सर्व डाॅक्टरांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डाॅ धनाजी खताळ,डाॅ मामासाहेब जगदाळे,डाॅ राहुल पाटील,डाॅ लोंढे,डाॅ प्रशांत पाटील,डाॅ पवार,विकास माने,श्याम नांगरे,महेश सटाले, शाहीर अण्णा इंदलकर यांचा सत्कार करण्यात आला तर सामाजिक कार्य म्हणून औद्योगिक प्रहारचे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे यांनी कोरोना रुग्णांसाठी दोन अंबुलन्स मोफत दिल्या आहेत तसेच तीन लाख रुपयाचा कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन दिल्या बद्दल त्यांचा यावेळी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच टेंभुर्णी चे पत्रकार सुहास साळुंखे,आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संपर्क प्रमुख तथा दिशा समितीचे सदस्स प्रा सुहास पाटील यांनी केले.यावेळी प्रा पाटील म्हणाले,माढा विधानसभा मतदार संघातील कोवीड काळात मदत केलेल्या सर्व डाॅक्टर्स,त्यांचे सहकारी व पत्रकार यांचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने सन्मान करणार आहोत.त्याची सुरूवात आंम्ही टेंभूर्णीतील डाॅक्टर मंडळीचा सन्मान करून करीत आहोत.यावेळी शिवसेनेचे नेते संजय कोकाटे ऊपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले,कोरोना काळात लोक भिती पोटी मरण पावले.सर्व लोकांनी जागृतपणे कोरोनाचे नियम पाळले पाहीजेत.त्याबरोबरच आर्युवेदामध्ये कोरोनावर लिंबु नाकात पिळण्याचे महत्व सांगीतले आहे त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन केले
या भोसले,जिल्हाध्यक्ष शशीकांत थोरात,माळशिरस भाजप नेते पांडुरंग वाघमोडे,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुशीलाताई पाटील,अॅड प्रशांत देशमुख,माढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड,पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, माजी जिल्हा संघटक विठ्ठल मस्के, बेंबळेचे सरपंच विजय पवार,टेंभूर्णी ग्रां पं सदस्स औदुंबर महाडीक व रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुदर्शन पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन प्रशांत करळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा