Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू*. *वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या मागणीला यश*


राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ?




*वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या मागणीला यश*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्य भरामध्ये लवकरात लवकर शाळा महाविद्यालये सुरू करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली कोरोणा चे नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत शिक्षण विभागाने या संबंधी मुख्यमंत्र्याकडे परवानगी मागितली होती दरम्यान कोणते वर्ग सुरू केले जाते ते सविस्तर माहिती दिली जाईल अशी माहिती ना. बच्चू कडू काय म्हणाले?
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.
आताच निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणत्या वर्गापासून शाळा सुरु होणार हे निश्चित सांगता येणार नाही. सोशल मीडियावर अनेक पालक तसेच विद्यार्थ्यांनी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली होती. काही संघटनांनीदेखील मागणी केली होती.
सर्व गोष्टींचा निर्णय घेऊनच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या काळात जशी आपण काळजी घेतली होती, त्याच धर्तीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात काळजी घेतली जाईल. कुठे रुग्णसंख्या वाढलीच तर आपण लगेच तपासणी करुन घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
या बातमीने सर्वच विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यामध्ये एक समाधान दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्यास होत असलेले विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. अनेक दिवसांपासून शिक्षणाचा झालेला गोंधळ कमी होईल  
शाळा सुरू होण्याच्या शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचे आम्ही वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे नांदेड च्या  वतीने आभार मानतो. 
असे नांदेड चे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.प्रविण जाधव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा