तुळजापूर येथील किरण (भाऊ) मित्र मंडळ यांच्या वतीने,मातंग समाजातुन
धम्मदिक्षा,बौध्दाचार्य,शिवाजीराव बाबुराव क्षिरसागर,गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
उस्मानाबाद,26/9/2021 रोजी,तुळजापुर शहरातील सर्किट हाऊस येथे,किरण (भाऊ) मिञ मंडळ,तुळजापुर जि.उस्मानाबाद च्या वतीने दुपारी 01,00 वाजता, कालकथित,शिवाजीराव बाबूराव क्षिरसागर (गुरुजी) यांना आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये अभिवादन करण्यात आले.या बाबत सविस्तर वृत्त असे की,कळंब शहरामध्ये राहणारे कालकथित,शिवाजीराव बाबुराव क्षिरसागर हे शिक्षक होते.त्यांचे दि.13/9/2021 रोजी,वृध्दापकाळाने कळंब येथे निधन झाले.सन 1978 - 79 मध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये क्षिरसागर गुरुजींनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मदिक्षा ग्रहण केली होती.तेव्हापासून क्षिरसागर गुरुजी है "बौद्धाचार्य" म्हणून ही समाजामध्ये सुप्रसिद्ध होते. एक बाजूला घर प्रपंचाच्या जबाबदारी व नोकरी सांभाळत समाजामध्ये कर्मकांड,अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये लढा उभा केला. तर बाल संस्कार,धम्म प्रसार-प्रचार करण्याचं काम क्षिरसागर गुरुजींनी संपूर्ण आयुष्यभर केले.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. क्षिरसागर गुरुजींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किरण (भाऊ) मिञ मंडळ,तुळजापुर च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुरेख संयोगाने सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन अाघाडीचे जेष्ट पदाधिकारी यांची ही उपस्थिती अभिवादन कार्यक्रमास लाभली.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मा.दत्ताभाऊ कांबळे,वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष,बी.डी.शिंदे,
जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,जेष्ट नेते मिलिंद रोकडे,यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तर जागृती फौंडेशनचे अध्यक्ष,विजय अशोक बनसोडे व मा.अंकुश लोखंडे यांनी धार्मिक विधी पार पाडत सामूहिक त्रिसरण पंचशील घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहून क्षिरसागर गुरुजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी जागृती फौंडेशनचे अध्यक्ष,विजय अशोक बनसोडे यांनी शिवाजीराव बाबुराव क्षिरसागर गुरुजी यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत असताना सांगितले की शिवाजीराव बाबुराव क्षिरसागर गुरुजी यांचा जन्म जरी मातंग समाजामध्ये झाला असला तरी क्षिरसागर गुरुजींनी धम्मदीक्षा घेऊन संपूर्ण जीवन समाजामध्ये जाणीव-जागृतीचे काम केले.तसेच गाव,खेड्यामध्ये बालकांना संस्कार करणे,विद्यार्थ्यांना शालेय मदत करणे,प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे,यासह विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत असत,असे सांगितले.यावेळी सोमनाथ नागटिळक,भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक,सुरेश (आप्पा) भिसे,जयभाऊ क्षिरसागर,
तसेच किरण (भाऊ) मिञ मंडळाचे संदिपराजे सिरसट,शाहिर गायकवाड,राम क्षिरसागर,लक्ष्मण कांबळे,बाबु शिंदे,श्रीकांत कांबळे,विशाल पारधे,सुरज डोलारे,जय जाधव,नागेश लोंढे,बाळा कांबळे,शंकर गायकवाड,लहु गायकवाड,केदार गायकवाड,
तर कार्यक्रमाचे सुञसंचलन किरण (भाऊ) कांबळे मिञ मंडळाचे प्रमुख किरण (भाऊ) कांबळे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सदाशिव शिंदे यांनी मानले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा