Breaking

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

भाग्यवरदायिनी "उजनी" १०० टक्के भरले....नियोजित १११% टक्के कडे वाटचाल सुरू......'१०९ टक्के नंतर नदीत पाणी सोडण्याचा विचार...'. " 42 वर्षात, १०० टक्के धरण भरण्याची 37 वी वेळ.....



...... आनंदी-वार्ता..

भाग्यवरदायिनी "उजनी" १०० टक्के भरले....
नियोजित १११% टक्के कडे वाटचाल सुरू......


'१०९ टक्के नंतर नदीत पाणी सोडण्याचा विचार...'


. " 42 वर्षात, १०० टक्के धरण भरण्याची 37 वी वेळ....."


 बेंबळे/ मुकुंद रामदासी
                                         

              सोलापूर ,पुणे व अहमदनगर जिल्ह्याची भाग्य वरदायिनी असलेले उजनी धरण मंगळवार दिनांक ५ ऑक्टोबर २१ रोजी सायंकाळी १०० टक्के भरले असून 117 टीएमसी पाणी साठा झालेला आहे. १५ ऑक्टोबर २१पर्यंत धरणात 111.19 टक्के पाणी पातळी व 123.28 टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे.  २०२१ च्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही एक लाख- दोन लाख क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही, परंतु दौंड येथून 3200 क्युसेक्स ते 25-35 हजार  क्यूसेक्स पर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज 100% ची पातळी गाठली आहे . धरणाच्या मागील 42 वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही 37  वी वेळ आहे.
         उजनी धरणाच्या वरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा,मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या 19 धरणांपैकी 16 धरणे शंभर टक्के भरून 'ओव्हरफ्लो' झालेली आहेत, तसेच यातील ६ ते ७ धरणांमधून जास्त झालेले एकुण सहा ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे, त्यामुळे सध्या बंडगार्डन येथील विसर्ग 5710 क्युसेक्स  आहे तर दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे व सध्या तो 7663 क्युसेक्स इतका आहे आणि यामध्ये प्रत्येक तासाला वाढ होत आहे .4 ऑक्टोबर पासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात  चांगली पर्जन्यवृष्टी चालू आहे व यामुळे सर्व नद्यांना पूर आलेले आहेत .हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे त्यामुळे धरणात 108 ते 109 टक्के पाणीसाठा होताच ,दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा विचार करून, धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल,अन्यथा तोपर्यंत नाही असे  धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात येत आहे. सध्या धरणात होत असलेल्या पाणीपातळीच्या वाढीकडे नियंत्रण विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.

          उजनी धरण नियोजित पातळीपर्यंत भरत असल्यामुळे  या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले हजारो-लाखो शेतकरी, उद्योजक, वीज निर्मिती यंत्रणा, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व अनेक लहान मोठे उद्योजक ,तसेच पुढील वर्षभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आसल्यामुळे  भीमा व सीना नदीकाठावरील शहरातील व ग्रामीण भागातील लाखो नागरिक आनंद व समाधान व्यक्त करत आहेत.


 5 ऑक्टोबर 2021 रोजी उजनी धरणाची रात्रीची स्थिती........
 पाणी पातळी 496.835 मिटर 
एकूण साठा 3321.72 दशलक्ष घनमीटर
                   117.29 टीएमसी
 
   उपयुक्त साठा 1518.91 दशलक्ष घनमीटर
                  53.63 टीएमसी
      टक्केवारी 100.11 % टक्के
 दौंड येथून विसर्ग.... 7663 क्यूसेक्स 
  बंडगार्डन विसर्ग.... 5710 क्यूसेक्स 
धरणातून विसर्ग....
 सीना- माढा सिंचन योजना... 259क्यूसेक्स
       दहिगाव..... 63 क्यूसेक्स 


       चौकट.....
                 नीरा खोरे ची स्थिती ......

   नीरा खोऱ्यातील गुंजवणी, देवधर, चिलेवाडी, भाटघर व वीर ही धरणे तीन आठवड्या पूर्वीच शंभर टक्के भरलेली आहेत. सध्या पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात, सातारा व महाबळेश्वर परिसरात चांगल्यापैकी पाऊस होत आहे. त्यामुळे या सर्व धरणात पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे .या परिस्थितीत वीर सहित सर्व धरणातील पाण्याची पातळी क्षमतेप्रमाणे नियोजित ठेवण्यासाठी वीर मधून नीरा नदीत आगामी दोन-तीन दिवसात केव्हाही पाणी सोडण्यात येणार आहे., योग्य वेळी सर्वांना सूचना देण्यात येतील असे नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे. निरेतून येणारे पाणी नरसिंगपूर येथे संगमाजवळ भीमा नदीस येऊन मिळते व तिथून पुढे भीमा नदीची पातळी गृहीत धरण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा