तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महाविद्यालय अद्ययावत होणे काळाची गरज-खासदार ओमराजे निंबाळकर.
तुळजापूर,दि.10, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गठीत सल्लागार समितीची महाविद्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली, याप्रसंगी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन बैठकीचा उदृदेश स्पष्ट केला. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की, आजच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून तांत्रिक व संगणकीय विश्र्वाचे ज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे, नव-नविन विषयाचे आणि आवश्यक असे ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.त्याचबरोबर आपले मराठवाडा क्षेत्र कमी पर्जन्यमानाचे असल्याने पाण्याविषयी जागृती करणे आवश्यक आहे.आपल्याकडे शाश्वत पाण्याअभावी उत्पादनाचे साधने शाश्वत नाहीत त्यामुळे भविष्यात होणारे महाविद्यालयीन परिसंवाद हे पाण्याच्या विषयी त्याच्या नियोजनाविषयी होणे गरजेचे आहे, त्याचबरोबर स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून मराठड्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची भूमिका स्पष्ट केली.सदर बैठकीसाठी तुळजापूर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महाविद्यालय विकास समिती सदस्य अशोकराव मगर,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ रमेश दापके,शाम पवार, युवानेते प्रतिक रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बैठकीच्या आयोजनासाठी प्रा.डॉ.एस.एम.देशमुख,प्रा.धनंजय लोंढे,प्रा.आशपाक आतार,प्रा.जे.बी क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.सदर बैठक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा