*अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून,त्यांना तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी,मल्हार आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.*
मा, जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाची नुकसान झाले,असून त्याना तातडीने आर्थिक मदत व शेतकऱ्यांचे सर्वांना मिळण्याबाबत मल्हार आर्मी संघाने निवेदन दिले आहे, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात येथील गेले पंधरा ते वीस दिवसांपासून सतत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी याची शासनाने योग्य ते रीतीने पीक पाहणी अँप मधून सातबारा नोंदणी करण्यात येणारे अडथळे दूर करावे, यामुळे काही शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर पिक पेरा लोन झाली नाही, व विमा कंपनी यांना ऑनलाइन तक्रार नोंद करणे, या विषयावर योग्य पर्याय नसल्यामुळे काही शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत, तरी साहेबांना या विषयावरती व्यवस्थित आर्थिक मदत शेतकर्यांना देण्यात यावी, अशी मागणी मल्हार आर्मी तालुका उस्मानाबाद यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे,या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष विठ्ठल खटके,यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले, यावेळी, अध्यक्ष गणेश सोनटक्के, व तालुका तालुका अध्यक्ष अशोक गाडेकर, सुभाष भुजंग ,शेंडगे, यांच्यासह मल्हार आर्मी चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा