*तुळजापूर येथे योग्य नियोजनामुळे शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वी- नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी,यांची माहिती*
कोरोना च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०२१ योग्य नियोजनामुळे यशस्वी झाला, असे भावना भाविक व पुजारी तसेच व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे, याचे सर्व श्रेय तुळजापूर नगरपरिषदेला व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना जाते यात्रा यशस्वी करण्यासाठी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ,तहसीलदार सौदागर तांदळे ,योगिता कोल्हे, युवा नेते विनोद (पिटू) गंगणे, पोलीस प्रशासन, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यात्रेचे पूर्वनियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सदरील यात्रा कालावधी अतिशय शांततेत सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून उत्साहात संपन्न झाला, याचे सर्व श्रेय तुळजापूर शहरातील सर्व नगरसेवक नगरपालिकेचे सर्व कर्मचारी पोलिस विभागाचे कर्मचारी व्यापारी पुजारी तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना जाते अशी मत तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांनी व्यक्त केले. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने तुळजापूर नगरपरिषदेने भाविकांच्या सोयी-सुविधासाठी विविध उपाय योजना केलेल्या होत्या. सदर उपायोजना विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर शहरातील नागरिक व भाविकांच्या सोयीसाठी नियमितपणे स्वच्छ व निर्जंतुक करून पाणि सोडण्यायाची दक्षता घेण्यात आली असून, सदर कामासाठी ४० टन तुरटी, ३०१ ब्लीचींग, ९०० केजी दोन फ्लोरिंग गैस, इत्यादी साहित्य यात्रेपूर्वी खरेदी करून घेतलेले होते. पाणि निर्जंतुकीकरण केल्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता आलेला आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी ९ ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली असून, त्यावर ३ शिफ्टमध्ये २८ रोजंदारी मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले होते. यात्रा कालावधीत घाटशिळ वाहनतळ येथे महिला मार्फत तसेच अपंग बचत गटामार्फत भाविकांच्या सोयीसाठी चप्पल स्टॅन्ड व क्लौकरुम या सुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या. शहराच्या विविध भागात भाविकांना अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे महिला व अपंगांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला असून, शहराच्या विविध भागांमध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने एकूण ८० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभा करण्यात आलेले होते. यात्रा कालावधीमध्ये बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी विश्रांती कक्ष, प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले असून तलाव व विहिरी लगत मजबूत बैराकडीग करण्यात आलेले होते. शहराच्या विविध भागांमध्ये ७ वहानतळ उभी करण्यात आलेली होती त्यामध्ये मजबुतीकरण केले होते. शहराच्या विविध भागांमध्ये नगरपरिषदेच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी एकूण ३ अग्निशमन वाहने कार्यरत (मुरूम, उस्मानाबाद व तुळजापूर) होते. त्यावर एकूण १३ कर्मचारी नियमीत कार्यरत होती सदरील वाहने नगरपरिषद कार्यालय, श्री. तुळजाभवानी महाद्वार समोर व वहानतळ पार्किंग या ठिकाणी नियमित सेवा बजावत होती. स्वच्छतेसाठी शहरात ३०० कामगार कार्यरत ठेवण्यात आली. सदर यात्रा कालावधीत भाविकांना चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवणे बाबत विविध पथके कार्यरत होती. भाविकांना घाटशिळ पार्किंग येथून प्रवेश देण्यात आला असून या ठिकाणी मोठा भव्य मंडप (८० बाय २५० यामध्ये २०००० लोक थांबू शकतील.) यात्रा कालावधीत सुरळीतपणे पार पडण्यासाठी मा. श्री कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद अध्यक्ष मंदिर संस्थान तुळजापुर यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन व सूचना केल्या असून त्यामुळे व्यवस्थापन करणे नगरपालिकेला शक्य झालेले आहे शिवाय पोलीस अधीक्षक , पोलीस उपाधीक्षक व पोलीस विभागाचे पूर्ण स्टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवून भाविकांना कुठलाही त्रास होऊ न देता सदर यात्रा कालावधीत पूर्ण पार पडण्यास मदत केली असून, वास्तविक covid-19 अद्याप संपलेला नसताना एवढ्या मोठ्या यात्रेचे अशाप्रकारे चांगले नियोजन करणं हे प्रशासनासाठी मोठी कसरत होती. परंतु प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे ही कसरत पूर्ण करणे शक्य झाले आहे. या कार्यात तुळजापूर शहरातील ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार नगराध्यक्ष सचिन ज्ञानोबा रोचकरी यांनी मानले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा