*तांबवे येथील भारत बळीराम करंडे यांचे निधन*
टेंभुर्णी प्रतिनिधी :- तांबवे येथील भारत बळीराम करंडे (वय-६५) यांचे आज पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, पाच भाऊ, एक बहीण,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी एक वाजता त्यांच्या शेतामध्ये करण्यात आला त्यावेळी तांबवे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते भारत बळीराम करंडे यांना नाना म्हणून ओळखले जात होते. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे नाना सर्वांशी हसून खेळून राहायचे ते सध्या तांबवे गाव हनुमान यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष होते त्यांच्या तिसऱ्या चा विधि सोमवार ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.
**************Advt************************************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा