शेतकरी हा जगाचा राजा आहे--पंजाब डख
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
बळिराजा महोत्सवानिमित्त अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे शेतकरी मेळावा व रक्तदान शिबीर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या आयोजनातुन घेण्यात आले.
शेतकरी हा जगाचा राजा आहे कारण कोरोणा काळात सगळे व्यवहार बंद होते पण शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले नव्हते त्यामुळे शेतकरी हा जगाचा राजा आहे असे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मत व्यक्त केले.शेतकर्यांनी नवनवीन बियाणे वापरणे काळाची गरज बनली आहे.मराठवाड्याला निसर्गाची वेळोवळी साथ लाभत आहे,कोरडा दुष्काळ मराठवाड्यात पडुच शकत नाही, पृथ्वी च्या तापमान वाढत असल्यामुळे पाऊसाची कमतरता भासणारच नाही .झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे झाडे लावल्यामुळे पाणी रिमझिम अशा पद्धतीने पडेल म्हणजे शेतीचे नुकसान होणार नाही असे ही यावेळी डख म्हणाले.देगाव हे गाव जगाच्या पातळीवर नेण्याचे काम भगवान कदम करतील, बळिराजा हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन शासनाने बदलला पाहिजे असे मत प्रमुख व्याख्याते प्रा.नामदेव दळवी यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराम कदम हे होते.रक्तदान शिबीराचे उद्घाटन अर्धापुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले.प्रल्हाद इंगोले,संभाजी ब्रिगेड चे संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ विद्या पाटील,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,मराविम चे उप अभियंता रायगिलवार,मालेगावचे आरोग्य अधिकारी धनगे,जिल्हाकार्याध्यक्ष कमलेश कदम,जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत टाकळे,जेजेराव शिंदे,नितीन कोकाटे,सतीष व्यवहारे,आंकुश कोल्हे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात १७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांनी केले.संचलन दशरथ कदम यांनी तर आभार गजानन कदम यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश कदम,विठ्ठल भिसे,बाला कदम,विश्वांभर कदम,व्यंकट कदम, ज्ञानोबा कदम,अभिमन्यु कदम, ज्ञानेश्वर कदम, संतोष कदम,मधुकर कदम,मारोती कदम आदिंनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा