Breaking

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

खटावच्या पैलवानाने केले नवागतांचे स्वागत



खटावच्या पैलवानाने केले नवागतांचे स्वागत 



वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         कोरोनाच्या संकटकाळात तब्बल २० महिने शाळा बंद असणे हि शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा शासन नियमानुसार १५ जून ऐवजी १ डिसेंबरला चालू करण्यात आल्या व विशेष म्हणजे जूनमधील पाऊस व डिसेंबरमधील पाऊस हा योगायोग जुळून आला. शासन नियमानुसार प्राथमिक शाळा चालू झाल्या असून खटावच्या राजकारणातील पैलवान व माजी सभापती संदिपदादा मांडवे यांनी भुरकवडी, ऊंबर्डे, ना. कुमठे आदि गावातील शाळेला भेटी देऊन नवगत विद्यार्थीचे स्वागत करून शालेय साहित्याचे वाटप केले. 
       नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना श्री. मांडवे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे २० महिने बंद असलेल्या प्राथमिक शाळा शासनाने चालू केल्या असून विद्यार्थांबरोबर शिक्षक व पालक यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून आपल्या पाल्यला नियमित शाळेत पाठवून प्राथमिक शिक्षण चांगले मिळावे व आपल्या पाल्यांचा पाया भक्कम करून शाळेविषयी गोडी निर्माण करावी. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहर, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य तसेच अंडयाचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगासने केल्याने आरोग्य चांगले राहून रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
          यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सभापती संदिप मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा