*जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे उपलब्ध करून देणे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
दिनांक ९, डिसेंबर २०२१, रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,जिल्हा बँकेमध्ये आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आले नाहीत,जो विमा सरकार व विमा कंपनीकडून येत आहे,तो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होत नाही, ते पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून द्यावेत, आणि शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम उचलता यावी या हिशोबाने शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये पैसे न कपात करता, त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे, आणि ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये पैसे उपलब्ध होत नाहीत,अनेक ग्रामीण शाखेमध्ये सुद्धा पैसे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना पैसे उचलता यावे यासाठी स्वतः आपण लक्ष घालून आणि पैसे उपलब्ध कसे होतील यासाठी जिल्हा बँकांना व ग्रामीण शाखेला आदेश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, अमर हाजगुडे यांची स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा