किनवट पंचायत समिती १५ गावावर मेहरबान
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : तालुक्यात १३४ ग्रामपंचायत असुन १५ व्या वित्त आयोगाचा निधी १० टक्के प्रमाणे शासनाकडुन पंचायत समितीला वर्ग करण्यात आला.एकत्रित तो निधी सर्व ग्रामपंचायतचा मिळुन ३ कोटी १५ लाख होता.परंतु तालुक्यातील सर्व १३४ ग्रामपंचायतला निधी वाटप करावे लागत होते पण पंचायत समिमीचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे व पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी संगनमत करून फक्त ४७ ग्रामपंचायतीला निधी दिला.तर त्यापैकी फक्त १५ ग्रामपंचायला लाखो रु निधी देण्यात आला.११९ ग्रामपंचायत वर अन्याय करण्यात आला आहे.ज्या ग्रामपंचायतचा वार्षिक बजेट १० लाख रुपये आहे.आशा ग्रामपंचायतला आपले हितसंबंध जोपासून फक्त ५ महिन्यात ३० लाखाचा निधी नियमा बाहेर देण्यात आला.शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार न कराता देण्यात आलेल्या प्रशासकीय आदेश रद्द करण्यात यावे व नव्याने सर्व १३४ ग्रामपंचायत समाविष्ट करुन प्रशासकीय आदेश देण्यात यावे. अशी कायदेशीर नोटीस वकीला मार्फत मा.विभागीय आयुक्त मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व गटविकास अधिकार पंचायत समिती किनवट यांना देण्यात आली.व तसे नाही झाल्यास या विरूद्ध तालुक्यातील अन्यायग्रस्त ११९ सरपंच यांना घेउन उच्चन्यायालय औरगाबाद येथे पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बाळु पाटील पवार यांनी निवेदनात दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा