Breaking

रविवार, २० मार्च, २०२२

महिलांच्या विचाराचा सन्मान करून त्यांना समान वागणूक दिली तरच कुटुंबाची प्रगती होईल- प्राचार्य डॉ.महेंद्र कदम*



*महिलांच्या विचाराचा सन्मान करून त्यांना समान वागणूक दिली तरच कुटुंबाची प्रगती होईल- प्राचार्य डॉ.महेंद्र कदम*



AJ 24 Taas News Maharastra Network-  टेंभुर्णी प्रतिनिधी-आमोल भोसले


टेंभुर्णी, प्रतिनिधी/: कुटुंबातील संवाद बंद झाला असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरूण मुले बिघडू लागली आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे असून सर्वांनी महिलांच्या विचारांचा सन्मान केला पाहीजे त्यांना समान वागणूक दिली तरच आजच्या काळात कुटुंबाची प्रगती होईल असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. महेंद्र कदम यांनी व्यक्त केले. 


टेंभुर्णी प्रेस क्लब च्यावतीने टेंभुर्णी शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्यांचा सन्मान टेंभुर्णीतील रोटरी सांस्कृतिक भवन येथे करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डाॅ. कदम बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ.महेंद्र कदम म्हणाले, काळ खूप वेगाने बदलतोय. ज्या माणसाची ऐंशी टक्के शक्ती घरासाठी खर्च होते तो माणूस समाजासाठी काही करू शकत नाही. कौटुंबिक जबाबदारी महिलांनी घेतल्यानंतरच पुरूष मोकळेपणाने काम करू शकतात ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक संपन्नता आली की चैन करतो ही मानसिकता बदलण्याची गरज असून मुलांवर चांगले संस्कार,शिक्षणासाठी पैसे खर्च होणे आवश्यक आहे. शहाजी राजांनी जिजाऊंना स्वातंत्र्य दिल्यामुळेच त्या सक्षमपणे उभ्या राहिल्या. महिलांचा सन्मान ही भारताने जगाला दिलेले देण आहे संवादाने अनेक प्रश्न सुटतात. भारत अधिक सक्षम करायचा असेल तर कुटुंबातील महिलांच्या सन्मानापासून सुरूवात करावी.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी  एस.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचे सांगून प्रत्येक महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले यावेळी सविता जगताप, प्रा. मीनाक्षी जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

        यांचा झाला सन्मान 
शीला पाटील, सूरजा बोबडे, प्रा. उषा पाटील, स्वाती पाटील भीमानगरकर, जयश्री वाकसे, प्रा. मीनाक्षी जगदाळे, सविता जगताप, शीतल छोरिया-कोठारी, भाग्यश्री पाडे- पाटील , रेखा गाडेकर, अकोलेखुर्दच्या सरपंच रूपाली नवले , दहिवलीच्या सरपंच कैसर जहागीरदार, अतुल पाटील, अंकुश गोसावी, रंजना गोसावी 

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे प्रहारचे अमोल जगदाळे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार कोठारी, शहर अध्यक्ष महेश कोठारी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे,आरपीआय जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, शिवसेना शहरप्रमुख सुरेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिपक खोचरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ कदम, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे, क्रेटा केमिकल कंपनीचे राजु येवले, माजी उपसरपंच धनंजय गोंदिल, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, विजय खटके, संदीप मोकाशी,मा. ग्रा. सदस्य राहूल आरडे,भारत माने सर, चव्हाणवाडी चे तंटामुक्त अध्यक्ष अरूण चव्हाण, परमेश्वर खरात, विकास धोत्रे, चव्हाणवाडी चे सरपंच सुनिल मिस्कीन, नवनाथ शिंदे, भाजपाचे ता.उपाध्यक्ष विजय कोकाटे, वंचित आघाडीचे राहुल चव्हाण, विशाल नवगिरे,  दादासाहेब मिसाळ, वडार समाजाचे युवा नेते राम पवार, भा.ज.पा.चे सुभाष इंदलकर, मा.चेअरमन राहुल चव्हाण, विठ्ठल मस्के, शिंदे गुरुजी,अविनाश धोत्रे, जाधव, हवाबी मुलाणी, सुवर्णा भोसले, उल्फत मुलाणी, स्मिता पालांडे, अंजली अरगडे, आदी उपस्थित होत्या. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप, सचिव सुरज देशमुख,उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, डी एस.गायकवाड, सोपान ढगे, संतोष पाटील, सदाशिव पवार, सचिन होदाडे, सतीश काळे, गणेश चौगुले यांनी परिश्रम घेतले. आभार सतीश चांदगुडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा