Breaking

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात 23 लाख टन ऊस गळिताचा विक्रमी टप्पा पूर्ण....... 25 लाख मेट्रिक टन गाळपाकडे वाटचाल....संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही......


विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात 23 लाख टन ऊस गळिताचा विक्रमी टप्पा पूर्ण.....
.. 25 लाख मेट्रिक टन गाळपाकडे वाटचाल....

संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही......
                           आमदार बबनदादा शिंदे

 बेंबळे ।प्रतिनिधी                     फोटो

     माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 23 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रमी टप्पा पार केला असून 25 लाख मेट्रिक टन किंवा त्याच्या जवळपास ऊस गाळप केले जाईल असा अंदाज आहे . कारखान्याकडे नोंदल्या गेलेल्या एकूण ऊसा पैकी अद्याप  दीड ते दोन लाख टन ऊस गळीतासाठी शेतात उभा आहे, परंतु शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा धीर सोडू नये कारण ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा सुसज्य कार्यरत आहे व संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही अशी ठाम ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.15 मार्च पासून उन्हाळ्याची तीव्रता वाढत असली तरी कारखान्याचे 550 ट्रॅक्टर्स व ट्रक्स, 650 बैलगाड्या व तीनशे बजेट ( युवराज) अशी तोडणी वाहतुकीची यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे, यामुळेच सध्या देखील प्रतिदिन दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत उसाचे गाळप करण्यात येत आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन एकशे नव्वद दिवस पूर्ण झाले असून 26 एप्रिलपर्यंत कारखान्याने 23 लाख 21 हजार 845 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करून 21 लाख 81 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे ,यापुढे 12 ते 15 मे पर्यंत गळीत हंगाम चालू ठेवून संपूर्ण उसाचे गाळप निश्चित केले जाईल., कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस गळीताअभावी शिल्लक राहणार नाही ,असे ठाम प्रतिपादन संस्थापक- अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे .याच प्रकारे कारखान्याने आजपर्यंत को-जनरेशन प्लांट मधून नऊ कोटी 92 लाख 87 हजार पाचशे युनिट वीज निर्मिती केलेली असून डिस्टीलरी प्रकल्पामधून दोन कोटी 99 लाख 67 हजार 543 बल्क लिटर  उत्पादन केले आहे.

 एप्रिलमध्ये ज्यादा दर....
        एक एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत गळीतास असलेल्या उसाला 2200 रुपये प्रति टन प्रमाणे  दर दिला आहे तर 16 एप्रिल पासून पुढे गळीतास येत असलेल्या उसाला 2300 रुपये प्रति टन दर दिला जात आहे., प्रत्येक दहा दिवसाला उस बिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत, त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची बिलेही वेळेवर दिली जात आहेत.
               कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी  चालू ठेवण्यामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव, पांडुरंग थोरात, सुरक्षा अधिकारी दुंगे, इंजिनीयर विभाग प्रमुख सीएस भोगाडे, चिफ केमिस्ट पोपटराव येलपले, शेती अधिकारी संभाजी थिटे, सुनील बंडगर, नारायण लगड, चंदनकर ,अकौंट विभागाचे लवटे, देसाई, कॉम्प्युटर विभागाचे खेडेकर कोजनरेशन विभागाचे पांडुरंग बागल,तसेच तात्यासाहेब देवडकर, सुनील शिंदे, कामगार युनियन प्रमुख अनिल वीर व  प्रशासनातील शशिकांत पवार आदी सर्व मान्यवर अधिकारी  व कर्मचारी अतिशय काळजीपूर्वक व नियोजनबद्ध गळीत हंगाम चालवत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा