सोलापूर - पुणे . मोहोळ - पंढरपूर महामार्गावरील ब्लॅकस्पाॅट कमी होणे गरजेचे .
मोहोळ प्रतिनिधी - सोलापूर - पुणे व मोहोळ - पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्गा चौपदरी झाल्याने दुचाकी सह चार चाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत . मात्र या महामार्गावर अवश्यक ठिकाणी तसेच गावाजवळ क्राॅसिंगवर पांढरे पट्टे नसल्याने आणि जे आहे ते पुसट झाल्याने या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे . मात्र अपघात कमी करण्यासाठी कोणतेही उपयोजना होत नसल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर उपाय योजना होणार अशी विचारणा आता संतप्त सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांमधून होत आहे .
राष्ट्रीय महामार्ग झाल्याने इच्छित स्थळी पोहचविण्याच्या वेळात मोठी बचत झाली आहे . त्यामुळे ठरावीक वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत . सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्याच्या हद्दीत अनेक गावे येतात . त्या गावातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर पार करून मग यावे लागते . अपवाद वगळला तर गावाजवळ पांढरे पट्टे ओढलेले नाहीत . त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपण कुठून जायचे ही माहिती होत नाही त्याची चलबिचल होते . त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात . विशेष म्हणजे - शेटफळ ते चिंचोली औद्योगिक वसाहती पर्यंतचा सर्व्हिस रोड देखील गायब आहे . या बाबत विविध राजकीय पक्ष . स्वयम सेवी संस्थानी तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी या बाबत आवाज देखील उठवला मात्र प्रशासनाने याची कुठलीच दखल घेतली नाही . उलट कागदी घोडे नाचवणे व आश्वासन देणे या पलीकडे काहीही झाले नाही . त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते याचं पोलखोल होणे गरजेचे आहे . ज्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त अपघात झाले तर तो ब्लॅक स्पॅट म्हणून घोषित केला जातो . सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ हद्दीत असे पंधरा ब्लॅक स्पाॅट आहेत . अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपयोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी . सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी. प्रादेशिक परिवहन अधिकारी . यांनी संयुक्त बैठक घेऊन यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे . मात्र तसे होताना दिसत नाही . महामार्गावरून विरूद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने हि अपघाताचे मोठे कारण आहे
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर दर्गा . अर्जुनसोंड फाटा . लांबोटी . कोळेगाव . चंदननगर . वडवळ .चंद्रमोळी औद्योगिक वसाहत . कन्याप्रशाला चौक ( सिमोंलघन पांदरोड ) . मोहोळ नरखेड क्राॅसिंग फाटा . कचरे पेट्रोल पंप . यावली क्राॅसवर अनगर फाटा . चिखली टाॅवर . हिवरे . तेलंगवाडी . शेटफळ . अशा ठिकाणी तसेच मोहोळ - पंढरपूर महामार्गावरील नारायण चिंचोली ( नवीन ब्रिज ) ते खांडेकर वस्ती . तुंगत वळण रस्ता ते टोलनाका गोसावीवाडी येथे ब्लाॅक स्पाॅट आहेत . परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी . सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी . पोलिस निरीक्षक . यांनी अपघात का होतात ? याची वेळोवेळी पडताळणी केली पाहिजे . अपघात प्रवण क्षेत्राचे फलक लावले पाहिजेत जागोजागी रेडियम करणे गरजेचे आहे . तसेच गावाजवळील झेब्रा क्रॉसिंग वर पांढरे पट्टे ओढणे गरजेचे आहे . शिवाय एखाद्या ठिकाणी शाळा असेल त्या ठिकाणी सुध्दा फलक लावणे तर गरजेचे आहे . परंतु ग्रामीण भागातील जनतेला समजेल असे योग्य ते फलक जागोजागी लावले पाहिजेत अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा