*बिरवली येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त, सामाजिक उपक्रम म्हणून भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने थंड पाण्याची सोय*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बिरवली गाव ता.औसा येथे सामाजिक उपक्रम म्हणून थंड पाणी ची व्यवस्था भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश आप्पा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेतृत्व मयुर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी अमर भाऊ कांबळे, विकास भिसे, विक्रम भाऊ रणसिंगे, चंद्रकांत भिसे, सचिन भिसे,अमोल भिसे, समाधान सुरवसे, अभिषेक गायकवाड,सुशिल गायकवाड, महेश कांबळे आदी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात भिम सैनिक उपस्थित होते.
यावेळी केलेल्या चांगल्या उपक्रमाचे आभार मंडळाचे पदाधिकारी विश्वजीत गोरे , बालाजी गोरे,लिंबराज गोरे यांनी आभार मानले.तसेच गावातील सरपंच, पोलिस पाटील , पोलिस डिपार्टमेंट यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा